शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील नितीश कुमार सरकार संकटात? जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात

By बाळकृष्ण परब | Updated: December 30, 2020 09:51 IST

Nitish Kumar Government : एनडीएमध्ये भाजपा मोठा तर नितीश कुमारांचा जेडीयू लहान पक्ष ठरल्याने या सरकारवर स्थापनेपासूनच अस्थिरतेची तलवार टांगली गेली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय जनता दलाचे नेते श्याम रजक यांनी नितीश कुमार सरकारच्या भवितव्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात असून, ते लवकरच लालूप्रसाद यादव यांच्या पक्षात दाखल होतीलजेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी श्याम रजक यांचा दावा लावला फेटाळून

पाटणा - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत सत्ता राखली होती. मात्र एनडीएमध्ये भाजपा मोठा तर नितीश कुमारांचा जेडीयू लहान पक्ष ठरल्याने या सरकारवर स्थापनेपासूनच अस्थिरतेची तलवार टांगली गेली आहे. दरम्यान, राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्याम रजक यांनी नितीश कुमार सरकारच्या भवितव्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात असून, ते लवकरच लालूप्रसाद यादव यांच्या पक्षात दाखल होतील, असा दावा, रजक यांनी केला आहे.श्याम रजक यांनी सांगितले की, हे सर्व आमदार भाजपाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे जेडीयूला सोडचिठ्ठी देऊन आरजेडीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या या आमदारांना थांबवण्यात आले आहे. जर हे आमदार सध्या आरजेडीमध्ये दाखल झाले तर त्यांच्यावर पक्षांतर कायद्यांतर्गत कारवाई होऊन त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. मात्र या कायद्यानुसार जेडीयूचे २५ ते २६ आमदार पक्ष सोडून आरजेडीमध्ये आल्यास त्यांच्या सदस्यत्वाला धोका निर्माण होणार नाही.जेडीयूचे अजून काही आमदार पक्ष सोडण्याचा विचार करतील आणि आरजेडीमध्ये दाखल होतील. सध्या माझ्या माध्यमातून हे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात आहेत, असा दावा रजक यांनी केला. तसेच सध्या संपूर्ण घटनाक्रमावर आपली नजर असल्याचेही रजक यांनी सांगितले. भाजपाने अरुणाचल प्रदेशमध्ये जेडीयूच्या सहा आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. या घटनेमुळे भाजपा नितीश कुमार यांच्यावर वर्चस्व दाखवू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे बिहारमधील हे १७ आमदार नाराज आहेत, असा दावा रजक यांनी केला.मात्र जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी श्याम रजक यांचा दावा फेटाळून लावला आहे. श्याम रजक यांचा दावा भ्रामक आणि दिशाभूल करणारा असल्याचे राजीव रंजन यांनी म्हटले आहे. तसेच जेडीयू पूर्णपणे एकसंध असून, भाजपासोबत सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच जेडीयूचे आमदार आरजेडीच्या संपर्कात नाहीत तर आरजेडीचेच आमदार तेजस्वी यादव यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची टीका राजीव रंजन यांनी केली.२४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२३ आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला १२५ तर आरजेडीच्या नेतृत्वातील महाआघाडीला ११० जागा मिळाल्या होत्या. एनडीएमध्ये भाजपाला ७४ तर जेडीयूला ४३ आणि इतर पक्षांना ८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या आकड्यात किंचीत बदल झाला तरी नितीश कुमार सरकार अडचणीत येऊ शकते.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBJPभाजपाPoliticsराजकारण