शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

मुख्यमंत्रिपदी नितीशकुमारच; बिहार भाजपमध्ये दुमत नाही, मात्र दोन उपमुख्यमंत्रिपदांचा आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 07:04 IST

त्यादृष्टीने वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. बिहारमध्ये भाजपने ७४ तर जेडी

- हरिश गुप्तानवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्ये (एनडीए) भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. आता आधी दिलेल्या शब्दानुसार विद्यमान मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीशकुमार यांच्याकडेच राज्य सरकारचे नेतृत्व राहील, याबाबत भाजपमध्ये कोणतेही दुमत नाही. मात्र, त्या मोबदल्यात भाजपला २ उपमुख्यमंत्रिपदांसह महत्वाची खाती हवी आहेत.

तसेच नव्या मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात सामावून घ्यायचे आहे. त्यादृष्टीने वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. बिहारमध्ये भाजपने ७४ तर जेडीयूने ४३ जागा जिंकल्या. राज्यात मित्रपक्षापेक्षा जास्त जागा जिंकण्याची ही भाजपची पहिलीच वेळ. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाने ३१ जागा जास्त जिंकल्या. मतांमध्येही चार टक्क्यांनी वाढ झाली. 

भाजपला हवी महत्त्वाची खाती  

भाजप आणि जेडीयूला आता सत्तेतील वाट्याचा प्रश्न सोडवायचा आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना कायम ठेवायचे झाल्यास भाजपकडून दोन उपमुख्यमंत्रिपदांची मागणी होऊ शकते. तसेच भाजपला महत्त्वाची खाती हवी आहेत. 

विकासशील इन्साफ पार्टी (व्हीआयपी)लाही मंत्रिमंडळात सामावून घ्यायचे आहे. तसेच काँग्रेसच्या १९ आमदारांनाही फोडण्याची भाजपची योजना आहे.

एनडीएमध्ये ‘चिराग’ नको : नितीशकुमार

निवडणुकीत सातत्याने त्यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीला एनडीएमध्ये स्थान देऊ नये, यासाठी नितीशकुमार यांनी भाजपच्या पक्षनेतृत्वाकडे आग्रह धरला आहे. 

चिराग यांच्या भूमिकेमुळे नितीशकुमारांना किमान २० जागांवर पराभव पत्कारावा लागला. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर नितीशकुमारांना जायचे नाही. 

हे सर्व मुद्दे सुटल्याशिवाय जेडीयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही.

राय यांच्याकडे  राज्याची धुरा?

प्रचाराची धुरा सांभाळून मोठा हातभार लावणारे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देऊन राज्यात परत पाठविण्याची भाजपची योजना आहे. त्यांनाच पुढे मुख्यमंत्रिपदी बसविण्याची चर्चा सुरु आहे. राय यांनी यावेळी २०० पेक्षा जास्त सभा घेतल्या. पक्षाचा ‘यादव’ चेहरा म्हणून ते समोर आले.

सीएम बदलण्याचा प्रश्नच नाही

भाजपने जदयूपेक्षा जास्त जागा जिंकल्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी दिलेला शब्द भाजप पाळणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, नितीशकुमार यांना बदलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे सुशील मोदी यांनी स्पष्ट केले. बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनीही हीच भूमिका घेतली. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक