शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये पुन्हा नितीश सरकार! १६ नोव्हेंबरला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 10:27 IST

nitish kumar : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्ये (एनडीए) भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सायंकाळी भाजपाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट केले.

पटना : बिहारमध्ये पुन्हा एकदा संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीशकुमार मुख्यमंत्री होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा नितीशकुमार मुख्यमंत्र्यांची शपथ घेतील. सुत्रांच्या माहितीनुसार, हा शपथविधी सोहळा 16 नोव्हेंबरला होऊ शकतो. नितीशकुमार यावेळी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. याआधी २००० मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या निवडणुकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनीच शपथ घेतली आहे.

यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्ये (एनडीए) भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री हा भाजपाचा व्हावा, अशी मागणी काही भाजपचे नेते करीत होते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सायंकाळी भाजपाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत जेडीयू आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला १२५ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये ७४ भाजपा, ४३ जेडीयू, ४ हम आणि ४ व्हिआयपीला जागा मिळाल्या आहेत. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीला फक्त ११० जागा मिळाल्या. 

नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार!बुधवारी उशिरा सायंकाळी नितीशकुमार यांनी ट्विट करून निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी जनता मालक आहे आणि त्यांनी एनडीएला पूर्ण बहुमत दिले आहे, असे नितीशकुमार म्हणाले. तसेच, निवडणुकीदरम्यान मिळालेल्या पाठिंब्याबद्दल नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

एनडीएमध्ये ‘चिराग’ नको : नितीशकुमारनिवडणुकीत सातत्याने त्यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीला एनडीएमध्ये स्थान देऊ नये, यासाठी नितीशकुमार यांनी भाजपच्या पक्षनेतृत्वाकडे आग्रह धरला आहे. चिराग यांच्या भूमिकेमुळे नितीशकुमारांना किमान २० जागांवर पराभव पत्कारावा लागला. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर नितीशकुमारांना जायचे नाही. हे सर्व मुद्दे सुटल्याशिवाय जेडीयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही.

भाजपाला हवी महत्त्वाची खाती भाजपा आणि जेडीयूला आता सत्तेतील वाट्याचा प्रश्न सोडवायचा आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना कायम ठेवायचे झाल्यास भाजपाकडून दोन उपमुख्यमंत्रिपदांची मागणी होऊ शकते. तसेच भाजपाला महत्त्वाची खाती हवी आहेत. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपा