शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

'निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही होऊ शकतं' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 11:39 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील संघर्षांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला बगल दिली. लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. 

ठळक मुद्देबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील संघर्षांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला बगल दिली.लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकतं, असे त्यांनी म्हटले आहे. 'कोलकात्यात जे घडले त्यावर संबंधित प्रशासन सविस्तर स्पष्टीकरण देईल. अशा गोष्टींवर मी प्रतिक्रिया देत नाही'

पाटणा - पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आता केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्षाचं केंद्र झाली आहे. शारदा घोटाळ्यावरुन या संपूर्ण संघर्षाला सुरू झाली. शारदा चिट फंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम काल कोलकात्यात पोहोचली. कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. यानंतर पश्चिम बंगालमध्ये रणकंदन सुरू झालं. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी (4 फेब्रुवारी) पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील संघर्षांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला बगल दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकतं, असे त्यांनी म्हटले आहे. 

'कोलकात्यात जे घडले त्यावर संबंधित प्रशासन सविस्तर स्पष्टीकरण देईल. अशा गोष्टींवर मी प्रतिक्रिया देत नाही. सीबीआय आणि सरकार यावर बोलतील; पण निवडणुकांची तारीख जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत देशात काहीही घडू शकतं' असं नितीशकुमार यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोधी पक्षांची महाआघाडी सत्तेतून नक्की घालवेल, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जनआकांक्षा' रॅलीमध्ये केला आहे. 

राहुल गांधी यांनी देश का चौकीदार चोर है, असा आरोपही पुन्हा केला. राहुल गांधी म्हणाले की, मोदी जिथे जातात तिथे भरभरून आश्वासने देतात. नितीशकुमारही असेच वागत आहेत. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली. ही ऐतिहासिक घोषणा असल्याचे भाजपाला वाटत आहे मात्र शेतकऱ्यांना दिलेली मदत तुटपुंजी आहे. त्यांच्या वाट्याला दरदिवशी फक्त 17 रुपयेच येणार आहेत.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीCBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगाल