शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

नितीन पटेल यांनी जिंकला पाटीदारांचा बालेकिल्ला, मेहसाणातील विजयामुळे भाजपाच्या गोटात आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 13:31 IST

मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी मतांची आघाडी घेतल्यामुळे पक्षावर नामुष्की ओढावेल असे वाटत होते. मात्र मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रुपानी आणि नितीन पटेल विजयी झाल्यामुळे भाजपाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षीपासून सुरु झालेल्या पाटीदार आंदोलनाचे मुख्य केंद्र म्हणून मेहसाणा सतत चर्चेत राहिले.हार्दिक पटेलच्या आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देण्याची जबाबदारी नितीन पटेल यांच्यावर आली. त्यांचा पराभव झाला असता तर भाजपाच्या गुजरातमधील आगामी वाटचालीवर मोठा परिणाम झाला असता .

मुंबई- गुजरात निवडणुकांची मतमोजणी सुरु झाल्यावर एका टप्प्यावर भाजपाचे महत्त्वाचे नेते पराभूत होतील अशी स्थिती निर्माण झाली होती. स्वतः मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी मतांची आघाडी घेतल्यामुळे पक्षावर नामुष्की ओढावेल असे वाटत होते. मात्र मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रुपानी आणि नितीन पटेल विजयी झाल्यामुळे भाजपाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.नितीन पटेल हे गुजरातच्या उपमुख्यमंत्रीपदी कार्यरत असणारे भाजपाचे महत्त्वाचे नेते आहेत. मेहसाणा जिल्ह्याच्या आणि पटेल समुदायाच्या राजकारणामध्ये त्यांचे नाव अत्यंत वरच्या स्थानी आहे. 1988 ते 1990 या काळामध्ये नितीन पटेल कादी पालिकेचे अध्यक्ष होते. सुमारे पंधरा वर्षे त्यांनी कादी पालिकेमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1990 ते 2002 असा प्रदीर्घकाळ ते विधानसभेत मेहसाणा मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर 2012 मध्ये पुन्हा मेहसाण्यातून निवडून गेले. 1990 पासून मेहसाणा जिल्ह्यामध्ये भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. मेहसाणा मतदारसंघातून 1990 पासून सलग 22 वर्षे खोडाभाई पटेल आमदार म्हणून गुजरात विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर अनिलभाई पटेल सलग दहा वर्षे भाजपाच्या तिकिटावर विधानसभेत गेले आणि 2012 साली नितीनभाई पटेल मेहसाणा मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले.आनंदीबेन पटेल यांच्याजवळचे नेते म्हणून ओळखले जाणारे नितीनभाई पटेल गेल्या वर्षी मुख्यमंत्री होतील अशी शक्यता निर्माण झाली होती. वयोमानाचे कारण पुढे करत आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर नितीन पटेल मुख्यमंत्रीपदी निवडले गेल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टही करण्यात आले होते. मात्र अगदी ऐनवेळी मुख्यमंत्रीपदी विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले व नितीन पटेल उपमुख्यमंत्री झाले. गेल्या वर्षीपासून सुरु झालेल्या पाटीदार आंदोलनाचे मुख्य केंद्र म्हणून मेहसाणा सतत चर्चेत राहिले. हार्दिक पटेलच्या आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देण्याची जबाबदारी नितीन पटेल यांच्यावर आली. त्यांचा पराभव झाला असता तर भाजपाच्या गुजरातमधील आगामी वाटचालीवर मोठा परिणाम झाला असता पण आता हा धोका टाळण्यात ते यशस्वी झाले आहेत.

 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017GujaratगुजरातIndiaभारत