शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

देशात लवकरच फ्लेक्स फ्युएल कार लाँच होणार; नितीन गडकरी म्हणाले, "100 टक्के इथेनॉलवर चालतील वाहने"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 08:51 IST

"ऑगस्टपासून इथेनॉलवर १०० टक्के चालणारी वाहने बाजारात लाँच केली जातील. बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत," असे नितीन गडकरी म्हणाले.

नवी दिल्ली : ऑगस्टमध्ये देशात १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने बाजारात आणली जातील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. "ऑगस्टपासून इथेनॉलवर १०० टक्के चालणारी वाहने बाजारात लाँच केली जातील. बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत," असे नितीन गडकरी म्हणाले.

टोयोटा कंपनीप्रमाणे ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के इलेक्ट्रिक वाहनेही बाजारात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. टोयोटा कंपनीची कॅमरी कार ६० टक्के पेट्रोल आणि ४० टक्के विजेवर चालते आणि या कंपनीच्या माध्यमातून आम्ही अशी आणखी वाहने बाजारात आणणार आहोत, जी ६० टक्के इथेनॉल आणि ६० टक्के विजेवर चालतील. ही देशात एकप्रकारे क्रांतीसारखी असतील, असे नितीन गडकरी म्हणाले.

"प्रत्येकाचे कामे पूर्ण होतील याची मी खात्री करतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी हे नेहमीच केले आहे. भाजपने आम्हाला सर्वांना न्याय देण्यास शिकवले आहे आणि ते आम्हाला मजबूत बनवते. मी भाजपचा कार्यकर्ता आहे, पण सरकार देशातील जनतेचे आहे. त्यामुळे 'सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत," असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

याचबरोबर, सर्व राज्यात मी राजकारणापासून दूर राहून रस्ते विकासाचे काम केले आहे. भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री विकास प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मला भेटायला येतात. अलीकडच्या काळात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी मला भेटायला आल्या आणि त्यांनी अनेक प्रकल्पांवर चर्चा केली, असे नितीन गडकरी म्हणाले.

"जनतेची सेवा करणे हे पहिले कर्तव्य"नितीन गडकरी म्हणाले की, "देशातील रस्ते अनेक राज्यांतून जातात. त्याठिकाणी काँग्रेस किंवा भाजपची सत्ता असू शकते. मात्र, याचा अर्थ काँग्रेसशासित राज्यांमध्ये विकासकामे थांबवावीत, असा अजिबात नाही. देशात जे काही रस्ते बांधले जातात ते येथील लोकांसाठी आहेत. मी भाजपचा कार्यकर्ता आहे, पण पहिल्यांदा मी भारत सरकारचा मंत्री आहे आणि माझी पहिली जबाबदारी आणि कर्तव्य हे देशातील जनतेची सेवा आहे."

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहन