शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

देशात लवकरच फ्लेक्स फ्युएल कार लाँच होणार; नितीन गडकरी म्हणाले, "100 टक्के इथेनॉलवर चालतील वाहने"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 08:51 IST

"ऑगस्टपासून इथेनॉलवर १०० टक्के चालणारी वाहने बाजारात लाँच केली जातील. बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत," असे नितीन गडकरी म्हणाले.

नवी दिल्ली : ऑगस्टमध्ये देशात १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने बाजारात आणली जातील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. "ऑगस्टपासून इथेनॉलवर १०० टक्के चालणारी वाहने बाजारात लाँच केली जातील. बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत," असे नितीन गडकरी म्हणाले.

टोयोटा कंपनीप्रमाणे ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के इलेक्ट्रिक वाहनेही बाजारात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. टोयोटा कंपनीची कॅमरी कार ६० टक्के पेट्रोल आणि ४० टक्के विजेवर चालते आणि या कंपनीच्या माध्यमातून आम्ही अशी आणखी वाहने बाजारात आणणार आहोत, जी ६० टक्के इथेनॉल आणि ६० टक्के विजेवर चालतील. ही देशात एकप्रकारे क्रांतीसारखी असतील, असे नितीन गडकरी म्हणाले.

"प्रत्येकाचे कामे पूर्ण होतील याची मी खात्री करतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी हे नेहमीच केले आहे. भाजपने आम्हाला सर्वांना न्याय देण्यास शिकवले आहे आणि ते आम्हाला मजबूत बनवते. मी भाजपचा कार्यकर्ता आहे, पण सरकार देशातील जनतेचे आहे. त्यामुळे 'सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत," असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

याचबरोबर, सर्व राज्यात मी राजकारणापासून दूर राहून रस्ते विकासाचे काम केले आहे. भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री विकास प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मला भेटायला येतात. अलीकडच्या काळात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी मला भेटायला आल्या आणि त्यांनी अनेक प्रकल्पांवर चर्चा केली, असे नितीन गडकरी म्हणाले.

"जनतेची सेवा करणे हे पहिले कर्तव्य"नितीन गडकरी म्हणाले की, "देशातील रस्ते अनेक राज्यांतून जातात. त्याठिकाणी काँग्रेस किंवा भाजपची सत्ता असू शकते. मात्र, याचा अर्थ काँग्रेसशासित राज्यांमध्ये विकासकामे थांबवावीत, असा अजिबात नाही. देशात जे काही रस्ते बांधले जातात ते येथील लोकांसाठी आहेत. मी भाजपचा कार्यकर्ता आहे, पण पहिल्यांदा मी भारत सरकारचा मंत्री आहे आणि माझी पहिली जबाबदारी आणि कर्तव्य हे देशातील जनतेची सेवा आहे."

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहन