शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Toll Plaza Free expressway: सुस्साट! नितीन गडकरींचा पहिला टोलनाकेमुक्त एक्स्प्रेसवे तयार; चालत्या गाडीचा कापणार टोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 16:31 IST

Meerut-Delhi expressway: एक्स्प्रेस वे काल सुरु जरी केला असला तरी देखील टोलचे दर अद्याप ठरवलेले नाहीत. यामुळे सध्या सर्व वाहने टोल न देताच जात आहेत. दर ठरल्यानंतर ही यंत्रणा कार्यरत होणार आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) काही दिवसांपूर्वीच येत्या दोन वर्षांत देशातील रस्ते टोलनाकेमुक्त (Toll Plaza free India) होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच पहिला एक्स्प्रेस वे टोलनाकामुक्त झाला आहे. म्हणजेच आता टोलनाक्यावर टोल कापला जाणार नसून तुम्ही कापलेल्या अंतराप्रमाणे चालत्या गाडीचा टोल कापला जाणार आहे. (Meerut-Delhi expressway is India's first Automatic toll collection Higway, No Toll Plaza. )

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे मंगळवारपासून सामान्यांच्या प्रवासासाठी खुला करण्यात आला. मेरठ ते दिल्लीपर्यंतच्या 85 किमीच्या ट्रॅफिकमधून मोठी सुटका झाली आहे. दिल्लीच्या निजामुद्दीनपासून मेरठच्या परतापूरपर्यंत असलेल्या या एक्स्प्रेस वेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर 2008 मध्ये विचार करण्यात आला. 2014 मध्ये भाजपा सरकार आल्यावर यावर शिक्कामोर्तब झाले. या प्रकल्पाची सुरुवात 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 

हा एक्स्प्रेस वे 2019 मध्येच पूर्ण होणार होता, मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यास विलंब झाला. 8346 कोटींचा हा रस्ता आता पूर्णपणे तयार झाला असून दररोज या रस्त्यावरून 50 हजार ते 1 लाख वाहने ये-जा करणार आहेत. या रस्त्यामुळे मेरठ ते दिल्ली हे अंतर केवळ 45 मिनिटांत कापता येणार आहे. 

टोल अद्याप ठरला नाही...एक्स्प्रेस वे काल सुरु जरी केला असला तरी देखील टोलचे दर अद्याप ठरवलेले नाहीत. यामुळे सध्या सर्व वाहने टोल न देताच जात आहेत. परंतू ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर सिस्टिमद्वारे टोल कापण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. दर ठरल्यानंतर ही यंत्रणा कार्यरत होणार आहे. 

एकही सिग्नल नाही...हा एक्स्प्रेस वे सिग्नल फ्री आहे. या रस्त्याचे सौदर्य वाढविण्य़ासाठी कुतुबमिनार आणि अशोक स्तंभासारखी चिन्हे लावण्यात आली आहेत. तसेच दोन्ही बाजुला गार्डन तयार करण्यात आले आहे. या रस्त्यावर ज्या लाईट असतील त्या पूर्णपणे सोलार सिस्टिमवर पेटणार आहेत.हा देशातील पहिला असा रस्ता आहे ज्यावर कार पुढे जात असताना आपोआप टोल कापला जाणार आहे. मेरठ दिल्ली हायवे हा डासनापर्यंत 14 लेनचा आहे. डासनानंतर तो मेरठपर्यंत सहा लेनचा करण्यात आला आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtollplazaटोलनाका