शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

"जो करणार जातीची बात, त्याच्यावर मारणार सणसणीत लाथ’’, जातिपातीच्या राजकारणावरून नितीन गडकरी संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 17:06 IST

Nitin Gadkari News: जातिपातीचं राजकारणं हे भारताच्या राजकीय क्षेत्रातील कटू वास्तव आहे. अनेक बडे नेते आणि सर्वच राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी कुठे ना कुठे जातिपातीच्या राजकारणाचा आधार घेत असतात. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपाच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे. 

जातिपातीचं राजकारणं हे भारताच्या राजकीय क्षेत्रातील कटू वास्तव आहे. अनेक बडे नेते आणि सर्वच राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी कुठे ना कुठे जातिपातीच्या राजकारणाचा आधार घेत असतात. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे. 

एका कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सध्या जातिपातीचं राजकारण होत आहे. मी जात-पात मानत नाही.  जो जातिपातीची बात करेल, त्याच्यावर मी सणसणीत लाथ मारेन, असा इशाराच नितीन गडकरी यांनी दिला. 

गडकरी पुढे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात ४० टक्के मुसलमान आहेत. मी त्यांना आधीच सांगितलं की, मी आरएसएसचा माणूस आहे. मी हाफ चड्डीवाला आहे. कुणालाही मत देण्यापूर्वी नंतर आपल्याला पुढे पश्चाताप होणार नाही याचा विचार केला पाहिजे. जो मला मतदान करेल त्याचं मी काम करणार आणि जो मत देणार नाही त्याचंही काम करणार, असे गडकरी यांनी सांगितले.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीपातीचं राजकारण कमालीच तीव्र झालेलं आहे. राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी समाप्त होणार असून, राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. मागच्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण अनेक उलथापालथींमुळे गाजत आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता कसा कौल देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र