शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

CAA: सोनिया गांधींकडून देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न: निर्मला सीतारमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 13:23 IST

नागरिकत्व विधेयकावरुन सत्ताधारी व विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

नवी दिल्ली: देशात सर्वत्र सुधारित नागरिकत्व विधेयकावरुन सर्वत्र आंदोलन सुरु असतानाच आता याच मुद्यावरून राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या कायद्याविरोधातील आंदोलनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रतिउत्तर दिले आहे. सोनिया गांधी ह्या देशातील नागरिकांची नागरिकत्व विधेयकावरुन दिशाभूल करत असल्याचा आरोप सीतारमण यांनी केला आहे.

नागरिकत्व विधेयकावरुन सत्ताधारी व विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तर जनतेला सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र सरकार त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा आवाज क्रूरपणे दाबत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी व्हिडीओ संदेशातून शुक्रवारी केला होता. तर सोनिया गांधी यांनी केलेल्या आरोपाला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.

सोनिया गांधी यांच्यावर आरोप करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, सोनिया गांधी ह्या चुकीच्या पद्धतीने CAA ची तुलना NRC सोबत करीत असून, ज्याचा मसुदा अद्याप तयार झाला नाही. तर सोनिया गांधी ह्या देशातील नागरिकांची नागरिकत्व विधेयकावरुन दिशाभूल करत असल्याचा आरोप सुद्धा सीतारमण यांनी केला आहे.

देशातील नागरिकांनी हिंसाचार आणि भीती पसरवणाऱ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे. देशातील जनतेला कोणत्याही भीतीखाली राहू नयेत. तर काँग्रेस, तृणमूल आणि आम आदमी पार्टी तसेच डावे पक्ष सुधारित नागरिकत्व कायद्याला एनआरसीशी जोडत आहे. प्रत्यक्षात मात्र एनआरसीचा मसुदा अद्यापही तयार करण्यात आला नसल्याचे सुद्धा सीतारमण म्हणाल्या.

तसेच देशातील जनतेने निराश झालेल्या काँग्रेस, टीएमसी, आप आणि डाव्या पक्षातील नेत्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नयेत. तर नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात कोणत्याही भारतीयांचे नागरिकत्व काढून घेणार नाही. या कायद्याचा कोणत्याही भारतीय नागरिकाशी काही संबंध नसल्याचे सुद्धा सीतारमण म्हणाल्या.