शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

CAA: सोनिया गांधींकडून देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न: निर्मला सीतारमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 13:23 IST

नागरिकत्व विधेयकावरुन सत्ताधारी व विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

नवी दिल्ली: देशात सर्वत्र सुधारित नागरिकत्व विधेयकावरुन सर्वत्र आंदोलन सुरु असतानाच आता याच मुद्यावरून राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या कायद्याविरोधातील आंदोलनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रतिउत्तर दिले आहे. सोनिया गांधी ह्या देशातील नागरिकांची नागरिकत्व विधेयकावरुन दिशाभूल करत असल्याचा आरोप सीतारमण यांनी केला आहे.

नागरिकत्व विधेयकावरुन सत्ताधारी व विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तर जनतेला सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र सरकार त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा आवाज क्रूरपणे दाबत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी व्हिडीओ संदेशातून शुक्रवारी केला होता. तर सोनिया गांधी यांनी केलेल्या आरोपाला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.

सोनिया गांधी यांच्यावर आरोप करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, सोनिया गांधी ह्या चुकीच्या पद्धतीने CAA ची तुलना NRC सोबत करीत असून, ज्याचा मसुदा अद्याप तयार झाला नाही. तर सोनिया गांधी ह्या देशातील नागरिकांची नागरिकत्व विधेयकावरुन दिशाभूल करत असल्याचा आरोप सुद्धा सीतारमण यांनी केला आहे.

देशातील नागरिकांनी हिंसाचार आणि भीती पसरवणाऱ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे. देशातील जनतेला कोणत्याही भीतीखाली राहू नयेत. तर काँग्रेस, तृणमूल आणि आम आदमी पार्टी तसेच डावे पक्ष सुधारित नागरिकत्व कायद्याला एनआरसीशी जोडत आहे. प्रत्यक्षात मात्र एनआरसीचा मसुदा अद्यापही तयार करण्यात आला नसल्याचे सुद्धा सीतारमण म्हणाल्या.

तसेच देशातील जनतेने निराश झालेल्या काँग्रेस, टीएमसी, आप आणि डाव्या पक्षातील नेत्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नयेत. तर नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात कोणत्याही भारतीयांचे नागरिकत्व काढून घेणार नाही. या कायद्याचा कोणत्याही भारतीय नागरिकाशी काही संबंध नसल्याचे सुद्धा सीतारमण म्हणाल्या.