शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Nirbhaya case : अक्षय कुमार सिंहच्या फाशीची कायम, पुनर्विचार याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 14:36 IST

'सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आहे'

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी अक्षय कुमार सिंहच्या फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने अक्षय कुमार सिंहने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. 

निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी अक्षय कुमार सिंह याने सुप्रीम कोर्टात फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती भानुमती, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. 'हा युक्तिवाद आम्ही याआधीच ऐकून घेतला आहे, असे सांगत सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली. 

अक्षय कुमार सिंहच्या वकिलांनी दिल्लीतील प्रदूषण आणि खराब हवेचा हवाला देतानाच, फाशीची शिक्षा दिली जाऊ नये, अशी विनंती केली होती. मात्र, त्यावर कोणत्याही परिस्थितीत या गुन्ह्यात माफी दिली जाऊ शकत नाही आणि दोषींना फाशीची शिक्षाच व्हायला हवी, असे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितले होते. 

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निर्भयाची आईने खूश असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, निर्भया प्रकरणी दोषी विनयच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींना अद्याप निर्णय दिला नाही. दया याचिकेशिवाय फाशी होऊ शकत नाही. अक्षय कुमार सिंह सुद्धा राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करु शकतो. 

याआधी या प्रकरणाताल विनय, पवन आणि मुकेश या दोषींनी अशाच प्रकारची याचिका हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र कोर्टाने त्या सर्व याचिका फेटाळून लावत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने फाशीवर शिक्कामोर्तब करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

दरम्यान, दिल्लीत १६ डिसेंबर रात्री निर्भयावर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून जबर जखमी अवस्थेत बसमधू बाहेर फेकण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर सिंगापूर येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप