शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यू जारी, लग्नाला 200 पेक्षा अधिक लोकांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 15:59 IST

देशात आत्तापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,650 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय टीम -09 ला निर्देश दिले आहेत. त्यानुसार, बाजारात मास्क नाही, तर सामान नाही.. अशी घोषणा करण्यात आली असून व्यापाऱ्यांना याबाबत जागरुक करण्याचेही त्यांनी सूचवले आहे.

लखनौ - देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनंतर आता ओमायक्रॉनचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,79,133 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. देशात गुरुवारी ओमायक्रॉनचे 64 नवे रुग्ण सापडले. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने शनिवारपासून राज्यात रात्रीची संचारंबदी लावण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात आत्तापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,650 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 374 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये, ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने काळजी व्यक्त होत आहे. त्यामुळे, उत्तर प्रदेश सरकारने 25 डिसेंबरपासून राज्यात रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, लग्नकार्यासाठी केवळ 200 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यापेक्षा, अधिक लोकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय टीम -09 ला निर्देश दिले आहेत. त्यानुसार, बाजारात मास्क नाही, तर सामान नाही.. अशी घोषणा करण्यात आली असून व्यापाऱ्यांना याबाबत जागरुक करण्याचेही त्यांनी सूचवले आहे. रस्त्यावर फिरताना आणि बाजारात खरेदी करताना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. लोकजागृती अधिक सक्षम बनवून पोलिसांनाही तैनात करावे, असेही योगींनी म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ट्रेसिंग अन् टेस्टींग करण्यात यावी, मग तो व्यक्ती कुठल्याही राज्यातून येवो किंवा विदेशातून येवो, असे निर्देशच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळावर अधिक सतर्कता राखण्यात यावी. तसेच, गरजेनुसार लोकांना क्वारंटाईन आणि रुग्णालयात भरती करण्यात यावे, असेही योगींनी बजावले आहे.  

केंद्रानेच दिले आहेत निर्देश 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हायलेव्हल मिटिंग घेतली होती. तत्पूर्वी केंद्र सरकारने ओमायक्रॉनवरून राज्य सरकारांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी राज्यांच्या कोणत्या जिल्ह्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत, त्यांचा डबलिंग रेट, क्लस्टरवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, नाईट कर्फ्यू आणि गर्दीच्या कार्यक्रमांना-ठिकाणांवर निर्बंध लादावेत, खासकरून उत्सव लक्षात घेऊन. कोरोनाचे रुग्ण वाढले तर कंटेनमेंट झोन, बफर झोन तयार करा, असे निर्देशही दिले आहेत.   

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन