शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'नाईस दॅट मिस्टर पटेल', राहुल गांधींकडून उर्जित पटेलांना शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 20:31 IST

उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीहीउर्जित पटेल यांची कमी सातत्याने जाणवेल, असे मोदींनी म्हटले आहे. तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उर्जित पटेल यांना शाबासकी दिली आहे. बहुत अच्छा मिस्टर पटेल, अखेर मिस्टर 56 इंच छातीवाल्यांपासून बँकांना वाचविण्यासाठी आपण पुढे आलात, कधीच नाही, यापेक्षा उशिर केव्हाही चांगला, असे राहुल यांनी ट्विट केलं आहे.      

उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उर्जित पटेल मोदी सरकारच्या दडपणाखाली काम करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बँकेतील सुत्रानुसार, पटेल ऑफिसला आले तेव्हापासूनच शांत होते, दुपार नंतर राजीनामा देत ते निघून गेले. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पटेल यांच्यासोबत काम करणं ही माझ्यासाठी आनंददायक गोष्ट होती. त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा मला नेहमी फायदा झाला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा." असंही ते पुढे म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची कमी कायम जाणवेल असे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेनंतर काँग्रेस नेत्यांनीही उर्जित यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपा आणि आरएसएसकडून देशातील संस्थांवर कब्जा करण्यात येत आहे. मात्र, देशाला हे कदापी मान्य नाही, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. तसेच राहुल यांनी उर्जित पटेल आणि सरकार यांच्यातील वादासंदर्भातील एक बातमीही शेअर केली आहे. राहुल यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनीच नेमलेले अधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. सीईएमधून यापूर्वी अरविंद सुब्रमण्यम बाहेर पडले आहेत. तर, आता उर्जित पटेल यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आजारी आहे. मात्र, मोदींना आपण स्वत: मोठे अर्थतज्ञ असल्याचे वाटते, त्यामुळेच त्यांना कुणाची गरज वाटत नाही, असे सिब्बल यांनी म्हटले आहे. 

तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही देशात आर्थिक आणिबाणी लागू झाल्याचे म्हटले आहे. तसेच आयआरबीआयच्या गव्हर्नरने राजीनामा देणे हे देशातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

 

दरम्यान, मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नरपद भूषवणं तसेच RBIच्या इतर पदांवर काम करणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती असं त्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUrjit Patelउर्जित पटेलNarendra Modiनरेंद्र मोदीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक