शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

'नाईस दॅट मिस्टर पटेल', राहुल गांधींकडून उर्जित पटेलांना शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 20:31 IST

उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीहीउर्जित पटेल यांची कमी सातत्याने जाणवेल, असे मोदींनी म्हटले आहे. तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उर्जित पटेल यांना शाबासकी दिली आहे. बहुत अच्छा मिस्टर पटेल, अखेर मिस्टर 56 इंच छातीवाल्यांपासून बँकांना वाचविण्यासाठी आपण पुढे आलात, कधीच नाही, यापेक्षा उशिर केव्हाही चांगला, असे राहुल यांनी ट्विट केलं आहे.      

उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उर्जित पटेल मोदी सरकारच्या दडपणाखाली काम करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बँकेतील सुत्रानुसार, पटेल ऑफिसला आले तेव्हापासूनच शांत होते, दुपार नंतर राजीनामा देत ते निघून गेले. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पटेल यांच्यासोबत काम करणं ही माझ्यासाठी आनंददायक गोष्ट होती. त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा मला नेहमी फायदा झाला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा." असंही ते पुढे म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची कमी कायम जाणवेल असे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेनंतर काँग्रेस नेत्यांनीही उर्जित यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपा आणि आरएसएसकडून देशातील संस्थांवर कब्जा करण्यात येत आहे. मात्र, देशाला हे कदापी मान्य नाही, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. तसेच राहुल यांनी उर्जित पटेल आणि सरकार यांच्यातील वादासंदर्भातील एक बातमीही शेअर केली आहे. राहुल यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनीच नेमलेले अधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. सीईएमधून यापूर्वी अरविंद सुब्रमण्यम बाहेर पडले आहेत. तर, आता उर्जित पटेल यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आजारी आहे. मात्र, मोदींना आपण स्वत: मोठे अर्थतज्ञ असल्याचे वाटते, त्यामुळेच त्यांना कुणाची गरज वाटत नाही, असे सिब्बल यांनी म्हटले आहे. 

तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही देशात आर्थिक आणिबाणी लागू झाल्याचे म्हटले आहे. तसेच आयआरबीआयच्या गव्हर्नरने राजीनामा देणे हे देशातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

 

दरम्यान, मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नरपद भूषवणं तसेच RBIच्या इतर पदांवर काम करणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती असं त्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUrjit Patelउर्जित पटेलNarendra Modiनरेंद्र मोदीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक