शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

'नाईस दॅट मिस्टर पटेल', राहुल गांधींकडून उर्जित पटेलांना शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 20:31 IST

उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीहीउर्जित पटेल यांची कमी सातत्याने जाणवेल, असे मोदींनी म्हटले आहे. तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उर्जित पटेल यांना शाबासकी दिली आहे. बहुत अच्छा मिस्टर पटेल, अखेर मिस्टर 56 इंच छातीवाल्यांपासून बँकांना वाचविण्यासाठी आपण पुढे आलात, कधीच नाही, यापेक्षा उशिर केव्हाही चांगला, असे राहुल यांनी ट्विट केलं आहे.      

उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उर्जित पटेल मोदी सरकारच्या दडपणाखाली काम करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बँकेतील सुत्रानुसार, पटेल ऑफिसला आले तेव्हापासूनच शांत होते, दुपार नंतर राजीनामा देत ते निघून गेले. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पटेल यांच्यासोबत काम करणं ही माझ्यासाठी आनंददायक गोष्ट होती. त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा मला नेहमी फायदा झाला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा." असंही ते पुढे म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची कमी कायम जाणवेल असे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेनंतर काँग्रेस नेत्यांनीही उर्जित यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपा आणि आरएसएसकडून देशातील संस्थांवर कब्जा करण्यात येत आहे. मात्र, देशाला हे कदापी मान्य नाही, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. तसेच राहुल यांनी उर्जित पटेल आणि सरकार यांच्यातील वादासंदर्भातील एक बातमीही शेअर केली आहे. राहुल यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनीच नेमलेले अधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. सीईएमधून यापूर्वी अरविंद सुब्रमण्यम बाहेर पडले आहेत. तर, आता उर्जित पटेल यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आजारी आहे. मात्र, मोदींना आपण स्वत: मोठे अर्थतज्ञ असल्याचे वाटते, त्यामुळेच त्यांना कुणाची गरज वाटत नाही, असे सिब्बल यांनी म्हटले आहे. 

तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही देशात आर्थिक आणिबाणी लागू झाल्याचे म्हटले आहे. तसेच आयआरबीआयच्या गव्हर्नरने राजीनामा देणे हे देशातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

 

दरम्यान, मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नरपद भूषवणं तसेच RBIच्या इतर पदांवर काम करणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती असं त्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUrjit Patelउर्जित पटेलNarendra Modiनरेंद्र मोदीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक