शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

CoronaVirus News: वृत्तपत्रांना आधार द्यावा, आयएनएसचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 02:53 IST

सरकारने या उद्योगाला वेळीच साहाय्य न केल्यास हा तोटा पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत १५ हजार कोटींच्या घरात जाऊ शकतो असा इशारा इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) या संस्थेने दिला आहे.

नवी दिल्ली : लॉक डाऊनमुळे वृत्तपत्र उद्योगाला आतापर्यंत ४ हजार कोटी रुपयांचा फटका बसला असून सरकारने या उद्योगाला वेळीच साहाय्य न केल्यास हा तोटा पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत १५ हजार कोटींच्या घरात जाऊ शकतो असा इशारा इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) या संस्थेने दिला आहे.आयएनएसचे अध्यक्ष शैलेश गुप्ता यांच्या सहीने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या उद्योगांत वृत्तपत्र उद्योग असल्याचे नमूद करून वितरण व जाहिरात या दोन्ही माध्यमांतून मिळणारा महसूल पूर्णत: खंडित झाल्याचे म्हटले आहे. नजीकच्या भविष्यातही खासगी उद्योगांकडून जाहिराती मिळण्याची शक्यता नसल्याने पुढील किमान सहा- सात महिने तोटा वाढतच जाणार आहे. केंद्राने वेळीच मदत न केल्यास हा उद्योग पूर्णत: कोलमडून पडण्याची भीती गुप्ता यांनी व्यक्त केली असून वृत्तपत्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदावर आकारण्यात येत असलेला ५ टक्के अबकारी कर रद्द करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या नुकसानीचा फटका वृत्तसृष्टीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या कार्यरत असलेल्या ३० लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना बसलेला असल्याचे या पत्राद्वारे केंद्रीय मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.वृत्तपत्र उद्योगामुळे १० लाख लोकांना थेट रोजगार मिळतो तर अन्य १८ ते २० लाख लोक अप्रत्यक्षरित्या या व्यवसायावर अवलंबून आहेत. सध्याच्या परिस्थितीत मासिकवेतन देण्यात तसेच विक्रेत्यांची देयके देण्यातही अनंत अडचणी येत आहेत, असेही गुप्ता यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. वृत्तपत्रांना पुढीलदोन वर्षे करांत सवलत दिलीजावी, शासकीय जाहिरातींच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ करावी,थकलेली सरकारी बिलेत्वरित फेडावीत तसेच वृत्तपत्रांसाठीच्या जाहिरातींवरल्या व्ययात शंभर टक्के वाढ करावी अशामागण्याही या पत्रातून करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस