पत्रकार परिषदेच्या बातम्या
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30
मराठा विद्या प्रसारक समाजाची निवडणूक

पत्रकार परिषदेच्या बातम्या
म ाठा विद्या प्रसारक समाजाची निवडणूकनागपूर : मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक १२ जुलैला संस्थेच्या सक्करदरा येथील कार्यालयात होत असून या निवडणुकीत स्वाभिमानी पॅनलला निवडून आणण्याचे आवाहन नरेंद्र मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केले. स्वाभिमानी पॅनलचे नेतृत्व राजे मुधोजी भोसले करीत असून निवडणुकीत १५०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संस्थेतर्फे भविष्यात सभागृह, समाजाच्या सभागृहाचे आधुनिकीकरण, सभासद संख्या वाढविणे, शाळेसाठी इमारतीची व्यवस्था, संस्थेच्या शाळेत सीबीएसई पॅटर्नची सुरुवात, शिवचरित्रावर आधारित कला दालन, वाचनालय, वसतिगृह, समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे वर्ग, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी, महिलांसाठी गृह उद्योग आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला राजे मुधोजी भोसले, मनोहर मोहिते, भाऊसाहेब सुर्वे, शितल सुरुशे आदी उपस्थित होते.............आरोग्य, सुरक्षेचा अभ्यासक्रमात समावेशाची मागणीनागपूर : भारतात विविध अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण ५० ते ७५ हजार आहे. त्यामुळे अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनच्या पदविकेत आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण या विषयाचा समावेश करण्याची मागणी हर्षवर्धन जगम यांनी पत्रकार परिषदेत केली. यामुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याचे सांगुन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याबाबत कायदा करून या अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली.....................विदर्भ जागरण कार्यक्रमाचा शुभारंभराणी निघोट यांची माहिती : प्रत्येक जिल्ह्यातून १०० गावांचा समावेशनागपूर : नेहरू युवा केंद्राच्यावतीने विदर्भातील अकोला, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात २९ जूनपासून विदर्भ जागरण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्राच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर राणी निघोट-द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली.अभियानात प्रत्येक जिल्ह्यातून १०० गावे निवडण्यात आली आहेत. या गावात तीन रथ नेण्यात येणार आहेत. रथावर पोस्टर, बॅनर, शासकीय योजनांची माहिती लावण्यात आली आहे. रथासोबत असलेली प्रशिक्षित युवकांची चमू पथनाट्य, सार्वजनिक सभेच्या माध्यमातून शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, महिला सशक्तीकरण, आर्थिक विकास, भष्टाचार आदींबाबत जनजागृती करण्यात येत आहे. २५ सप्टेबरला मथुरा येथे अभियानाचा समारोप होत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शरद साळुंके उपस्थित होते.................