शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

न्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणारा आला होता भारतात; 'या' ठिकाणांची केली रेकी

By देवेश फडके | Updated: January 4, 2021 15:14 IST

दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँडमधील क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करणारा दहशवादी सुमारे तीन महिने भारतात राहिला होता. भारतासह तो जागतिक पातळीवरील अनेक देश फिरला असल्याचे तपासात समोर आले आहे.

ठळक मुद्देन्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याने केला होता भारतदौराभारतातील मुंबई, जयपूर आणि गोव्यात केले होते वास्तव्यभारतीय गुप्तचर यंत्रणांच्या तपासावरून अनेक गोष्टी उघडकीस

नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँडमधील क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करणारा दहशवादी भारतात येऊन काही ठिकाणांची रेकी करून गेला होता, अशी माहिती आता उघडकीस आली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून याबाबतचा एक अहवाल जारी करण्यात आला. त्यात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. न्यूझीलँडमधील क्राइस्टचर्च भागात असलेल्या मशिदीवर १५ मार्च २०१९ मध्ये ब्रेंटन टॅरेंट नामक दहशतवाद्याने अंदाधूंद गोळीबार केला होता. यात ५१ जणांचा मृत्यू झाला होता. 

या हल्ल्यानंतर न्यूझीलँडच्या संरक्षण संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करण्यापूर्वी या दहशतवाद्याने जगातील अनेक भागांचा दौरा केला होता. यामध्ये भारतातीलही काही शहरांचा समावेश होता. न्यूझीलँडच्या संरक्षण संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तपास सुरू केला. सन २०१५-१६ या कालावधीत तो दहशतवादी भारतात आला होता. भारतातील मुंबई, जयपूर आणि गोवा या तीन ठिकाणी त्याने वास्तव्य केले होते. सर्वाधिक वास्तव्य त्याने गोव्यात केले होते, अशी माहिती भारतीय गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली. 

न्यूझीलँडमधील तपास यंत्रणांनुसार, चीन, रशिया, जपान, दक्षिण कोरिया आणि भारतासह अनेक देशांमध्ये ब्रेंटन टॅरेंट फिरून आला होता. एवढेच नव्हे, तर संपूर्ण न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलियाचा दौराही त्याने केला होता. मार्च २०१९ मध्ये मशिदीवर हल्ला करण्यापूर्वी त्याने मुस्लिम समाजाविरोधात अनेक पोस्ट फेसबुकवर शेअर केल्या होत्या, असेही तपासात उघड झाले असल्याचे समजते. 

टॅग्स :TerrorismदहशतवादNew Zealandन्यूझीलंडTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीMumbaiमुंबईgoaगोवा