शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

व्हॉट्सअ‍ॅपवरून पाच वेळाच फॉरवर्डची मिळणार मुभा, अफवा रोखण्यासाठी कंपनीने भारतात लागू केला नवीन नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 04:48 IST

भारतात व्हॉट्सअ‍ॅपवरून आता कोणताही संदेश फक्त पाच जणांनाच फॉरवर्ड करता येईल.

नवी दिल्ली : भारतात व्हॉट्सअ‍ॅपवरून आता कोणताही संदेश फक्त पाच जणांनाच फॉरवर्ड करता येईल. त्याची अंमलबजावणी या आठवड्यापासून सुरु झाली आहे. अफवांचा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्याबद्दल केंद्र सरकारने कान उपटल्यानंतर व्हॉट्सअपने हे पाऊल उचलले आहे. देशातील २० कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. त्या सर्वांनाच या नव्या नियमाचा फटका बसणार आहे.या नव्या नियमाबद्दल व्हॉट्सअ‍ॅपने गेल्याच महिन्यात सुतोवाच केले होते. व्हॉट्सअ‍ॅप कसे वापरावे, अफवा व खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी काय करता येईल याची माहिती देणारा एक नवीन व्हिडिओ या कंपनीने तयार केला. तो या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना उपलब्ध होणार आहे.एखादा संदेश आपण दुसºयांना पाठवितो त्यावेळी काही दक्षता घेणे आवश्यक असते. मूळ संदेश कोणी लिहिला हे माहीत नसल्यास त्यात नेमके काय म्हटले आहे याची खातरजमा करुन घ्यावी. त्यातील माहिती खरी न वाटल्यास तो संदेश इतरांना पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.>इतर देशांत एक संदेशवीस वेळा पुढे पाठविण्याची मुभाभारतामध्ये वापरकर्ते जेवढ्या प्रमाणात छायाचित्रे, संदेश, व्हिडिओ इतरांना पाठवितात तेवढा उत्साह अन्य देशांत आढळून येत नाही. भारताव्यतिरिक्त अन्य देशांत तेथील वापरकर्त्यांना एक संदेश दुसºयांना वीस वेळा पाठविण्याची मुभा व्हॉट्सअपने दिली आहे.राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम ही समाजमाध्यमे काही काळ बंद ठेवावीत, असे आदेश दूरसंचार खात्याने या दूरध्वनी कंपन्यांना दिल्याचे वृत्त होते. मात्र यासंदर्भात व्हॉट्सअपने म्हटले की, अफवा व खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन बंद करणे हा उपाय नाही. त्यापेक्षा वेगळ््या व प्रभावी उपाययोजना सरकारने कराव्यात.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपCentral Governmentकेंद्र सरकार