शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

व्हॉट्सअ‍ॅपवरून पाच वेळाच फॉरवर्डची मिळणार मुभा, अफवा रोखण्यासाठी कंपनीने भारतात लागू केला नवीन नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 04:48 IST

भारतात व्हॉट्सअ‍ॅपवरून आता कोणताही संदेश फक्त पाच जणांनाच फॉरवर्ड करता येईल.

नवी दिल्ली : भारतात व्हॉट्सअ‍ॅपवरून आता कोणताही संदेश फक्त पाच जणांनाच फॉरवर्ड करता येईल. त्याची अंमलबजावणी या आठवड्यापासून सुरु झाली आहे. अफवांचा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्याबद्दल केंद्र सरकारने कान उपटल्यानंतर व्हॉट्सअपने हे पाऊल उचलले आहे. देशातील २० कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. त्या सर्वांनाच या नव्या नियमाचा फटका बसणार आहे.या नव्या नियमाबद्दल व्हॉट्सअ‍ॅपने गेल्याच महिन्यात सुतोवाच केले होते. व्हॉट्सअ‍ॅप कसे वापरावे, अफवा व खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी काय करता येईल याची माहिती देणारा एक नवीन व्हिडिओ या कंपनीने तयार केला. तो या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना उपलब्ध होणार आहे.एखादा संदेश आपण दुसºयांना पाठवितो त्यावेळी काही दक्षता घेणे आवश्यक असते. मूळ संदेश कोणी लिहिला हे माहीत नसल्यास त्यात नेमके काय म्हटले आहे याची खातरजमा करुन घ्यावी. त्यातील माहिती खरी न वाटल्यास तो संदेश इतरांना पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.>इतर देशांत एक संदेशवीस वेळा पुढे पाठविण्याची मुभाभारतामध्ये वापरकर्ते जेवढ्या प्रमाणात छायाचित्रे, संदेश, व्हिडिओ इतरांना पाठवितात तेवढा उत्साह अन्य देशांत आढळून येत नाही. भारताव्यतिरिक्त अन्य देशांत तेथील वापरकर्त्यांना एक संदेश दुसºयांना वीस वेळा पाठविण्याची मुभा व्हॉट्सअपने दिली आहे.राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम ही समाजमाध्यमे काही काळ बंद ठेवावीत, असे आदेश दूरसंचार खात्याने या दूरध्वनी कंपन्यांना दिल्याचे वृत्त होते. मात्र यासंदर्भात व्हॉट्सअपने म्हटले की, अफवा व खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन बंद करणे हा उपाय नाही. त्यापेक्षा वेगळ््या व प्रभावी उपाययोजना सरकारने कराव्यात.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपCentral Governmentकेंद्र सरकार