भाजपात बदलाचे वारे नवी
By Admin | Updated: May 29, 2014 02:51 IST2014-05-29T02:51:39+5:302014-05-29T02:51:39+5:30
सरकार स्थापनेनंतर भाजपा नेतृत्वात बदलाचे वारे वाहत असतानाच पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी बुधवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या इतर काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.

भाजपात बदलाचे वारे नवी
दिल्ली : सरकार स्थापनेनंतर भाजपा नेतृत्वात बदलाचे वारे वाहत असतानाच पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी बुधवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या इतर काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. राजनाथ सिंह हे मोदी सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून पदारूढ झाले आहेत. उभयतांमध्ये भाजपाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाला सोपवायची, यासोबतच सरकार स्थापनेनंतर पक्षांतर्गत केल्या जाणार्या इतर बदलांवर चर्चा झाल्याचे समजते. पक्षाध्यक्षपदासाठी राजनाथ सिंह यांच्या जागी सरचिटणीस जे.पी. नड्डा, अमित शहा आणि अरुण माथूर यांची नावे आघाडीवर आहेत. या शर्यतीत नड्डा सर्वात पुढे असल्याचेही सांगितले जाते. भागवत यांच्यासोबत बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन संघ नेत्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती त्यांना दिली. रालोआ सरकारमध्ये समावेशामुळे राजनाथ सिंह पक्षाध्यक्षपद सोडतील, अशी अपेक्षा आहे. पक्षाचे बहुतांश नेते सरकारमध्ये आल्यामुळे पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणात बदलाची शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)