शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

शेतमाल खरेदीची नवी अन्नदाता संरक्षण योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 05:13 IST

आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्र सरकारने बुधवारी मंदीच्या काळातही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभावाएवढी किंमत हमखास मिळवून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (पीएम-आशा) नावाची योजना मंजूर केली.

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्र सरकारने बुधवारी मंदीच्या काळातही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभावाएवढी किंमत हमखास मिळवून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (पीएम-आशा) नावाची योजना मंजूर केली.शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट हमीभाव देण्याचे व त्यायोगे शेतकºयांचे उत्पन्न सन २०२०पर्यंत दुप्पट करण्याच्या महत्वाकांक्षी वचनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने हे ऐतिहासिक पाऊल असल्याचा दावा सरकारने केला. केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतमाल खरेदीच्या या नव्या पद्धतीस मंजुरी देताना केंद्र सरकारकडून राज्यांना दिल्या जाणाºया हमी रकमेत १६,५५० कोटी रुपयांनी वाढ करण्याचाही निर्णय घेतला. शेतमाल खरेदीसाठीची अर्थसंकल्पीय तरतूदही वाढविण्यात आली असून या योजनेसाठी वेगळे १५ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी सांगितले की, सरकार केवळ वाढीव हमीभावांची घोषणा करून थांबलेले नाही. तर त्यानुसार शेतकºयांना प्रत्यक्षात पैसे मिळतील याची खात्रीशीर व्यवस्था या नव्या निर्णयाने करण्यात आली आहे. शेतमालाच्या प्रत्यक्ष खरेदीवेळी प्रचलित बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असेल तर वरची रक्कम सरकार देईल.

टॅग्स :Farmerशेतकरी