शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

Delhi News: कधी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंदिस्त होत्या जगातील सर्वात सुंदर महाराणी, इंदिरा गांधींशी जोडलंय कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 18:50 IST

दिल्लीतील तिहार जेल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिहार जेल हे देशातीलच नाही तर आशिया खंडातील हाय सिक्युरिटी जेलपैकी एक आहे.

दिल्लीतील तिहार जेल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिहार जेल हे देशातीलच नाही तर आशिया खंडातील हाय सिक्युरिटी जेलपैकी एक आहे. सध्या दिल्ली-एनसीआरमधील प्रमुख कुख्यात गुन्हेगार येथे बंदिस्त आहेत. या कारागृहात नऊ वेगवेगळे तुरुंग असून, तेथे हजारो कैदी आहेत. जयपूरच्या महाराणी गायत्री देवीदेखील याच तुरूंगात होत्या . वास्तविक त्यांच्या तुरुंगात जाण्याचा संबंध देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी आहे.

२५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या २१ महिन्यांच्या कालावधीसाठी भारतात आणीबाणी घोषित करण्यात आली. यादरम्यान ३ सप्टेंबर १९७५ रोजी जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांना देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करण्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले. मात्र, अटकेनंतर सरकारने त्यामागे अन्य कारणेही दिली होती. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना अटक केली होती.

तर दुसरीकडे त्यांना विदेशी वस्तू छुप्या पद्धतीनं आयात करणं आणि विदेशी मुद्रा अधिनियमांतर्गत अटक करण्यात आल्याची चर्चा इंदिरा गांधी यांचे समर्थक करत होते. परंतु आपल्याला सत्ताधारी पक्षाच्या नेत्या इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाही वागणुकीचा विरोध केल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

… तेव्हा वाटली होती भीतीमहाराणी गायत्री देवी यांना जेव्हा तिहार तुरुंगात आणण्यात आलं तेव्हा त्या घाबरल्या होत्या त्यांना महिला वॉर्डमध्ये कैदी नंबर २२६५ देण्यात आला होता. त्या अनेक महिने या ठिकाणी कैद होत्या. परंतु प्रकृती खराब झाल्यानं नंतर त्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यादरम्यान, काश्मीरचे तात्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला त्यांना भेटण्यासाठी आले होते. मृदूला सिन्हा यांच्या ‘राजपथ से लोकपथ पर’ या पुस्तकात त्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

राजकारणात सक्रियमहाराणी गायत्री देवी या राजकारणात सक्रिय होत्या. त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजयही मिळवला होता. महिलांच्या अधिकारासाठीही त्यांनी खुप संघर्ष केला. महिलांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी जयपूरमध्ये शाळा सुरू केली. १९७५ मध्ये वोगनं त्यांना जगातील सर्वात सुंदर दहा महिलांच्या यादीत स्थान दिलं होतं. १९४० मध्ये त्यांचा विवाह महाराजा सवाई मानसिंह यांच्यासोबत झाला होता.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीIndiaभारत