शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

Delhi News: कधी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंदिस्त होत्या जगातील सर्वात सुंदर महाराणी, इंदिरा गांधींशी जोडलंय कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 18:50 IST

दिल्लीतील तिहार जेल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिहार जेल हे देशातीलच नाही तर आशिया खंडातील हाय सिक्युरिटी जेलपैकी एक आहे.

दिल्लीतील तिहार जेल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिहार जेल हे देशातीलच नाही तर आशिया खंडातील हाय सिक्युरिटी जेलपैकी एक आहे. सध्या दिल्ली-एनसीआरमधील प्रमुख कुख्यात गुन्हेगार येथे बंदिस्त आहेत. या कारागृहात नऊ वेगवेगळे तुरुंग असून, तेथे हजारो कैदी आहेत. जयपूरच्या महाराणी गायत्री देवीदेखील याच तुरूंगात होत्या . वास्तविक त्यांच्या तुरुंगात जाण्याचा संबंध देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी आहे.

२५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या २१ महिन्यांच्या कालावधीसाठी भारतात आणीबाणी घोषित करण्यात आली. यादरम्यान ३ सप्टेंबर १९७५ रोजी जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांना देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करण्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले. मात्र, अटकेनंतर सरकारने त्यामागे अन्य कारणेही दिली होती. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना अटक केली होती.

तर दुसरीकडे त्यांना विदेशी वस्तू छुप्या पद्धतीनं आयात करणं आणि विदेशी मुद्रा अधिनियमांतर्गत अटक करण्यात आल्याची चर्चा इंदिरा गांधी यांचे समर्थक करत होते. परंतु आपल्याला सत्ताधारी पक्षाच्या नेत्या इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाही वागणुकीचा विरोध केल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

… तेव्हा वाटली होती भीतीमहाराणी गायत्री देवी यांना जेव्हा तिहार तुरुंगात आणण्यात आलं तेव्हा त्या घाबरल्या होत्या त्यांना महिला वॉर्डमध्ये कैदी नंबर २२६५ देण्यात आला होता. त्या अनेक महिने या ठिकाणी कैद होत्या. परंतु प्रकृती खराब झाल्यानं नंतर त्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यादरम्यान, काश्मीरचे तात्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला त्यांना भेटण्यासाठी आले होते. मृदूला सिन्हा यांच्या ‘राजपथ से लोकपथ पर’ या पुस्तकात त्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

राजकारणात सक्रियमहाराणी गायत्री देवी या राजकारणात सक्रिय होत्या. त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजयही मिळवला होता. महिलांच्या अधिकारासाठीही त्यांनी खुप संघर्ष केला. महिलांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी जयपूरमध्ये शाळा सुरू केली. १९७५ मध्ये वोगनं त्यांना जगातील सर्वात सुंदर दहा महिलांच्या यादीत स्थान दिलं होतं. १९४० मध्ये त्यांचा विवाह महाराजा सवाई मानसिंह यांच्यासोबत झाला होता.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीIndiaभारत