शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

Delhi News: कधी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंदिस्त होत्या जगातील सर्वात सुंदर महाराणी, इंदिरा गांधींशी जोडलंय कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 18:50 IST

दिल्लीतील तिहार जेल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिहार जेल हे देशातीलच नाही तर आशिया खंडातील हाय सिक्युरिटी जेलपैकी एक आहे.

दिल्लीतील तिहार जेल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिहार जेल हे देशातीलच नाही तर आशिया खंडातील हाय सिक्युरिटी जेलपैकी एक आहे. सध्या दिल्ली-एनसीआरमधील प्रमुख कुख्यात गुन्हेगार येथे बंदिस्त आहेत. या कारागृहात नऊ वेगवेगळे तुरुंग असून, तेथे हजारो कैदी आहेत. जयपूरच्या महाराणी गायत्री देवीदेखील याच तुरूंगात होत्या . वास्तविक त्यांच्या तुरुंगात जाण्याचा संबंध देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी आहे.

२५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या २१ महिन्यांच्या कालावधीसाठी भारतात आणीबाणी घोषित करण्यात आली. यादरम्यान ३ सप्टेंबर १९७५ रोजी जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांना देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करण्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले. मात्र, अटकेनंतर सरकारने त्यामागे अन्य कारणेही दिली होती. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना अटक केली होती.

तर दुसरीकडे त्यांना विदेशी वस्तू छुप्या पद्धतीनं आयात करणं आणि विदेशी मुद्रा अधिनियमांतर्गत अटक करण्यात आल्याची चर्चा इंदिरा गांधी यांचे समर्थक करत होते. परंतु आपल्याला सत्ताधारी पक्षाच्या नेत्या इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाही वागणुकीचा विरोध केल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

… तेव्हा वाटली होती भीतीमहाराणी गायत्री देवी यांना जेव्हा तिहार तुरुंगात आणण्यात आलं तेव्हा त्या घाबरल्या होत्या त्यांना महिला वॉर्डमध्ये कैदी नंबर २२६५ देण्यात आला होता. त्या अनेक महिने या ठिकाणी कैद होत्या. परंतु प्रकृती खराब झाल्यानं नंतर त्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यादरम्यान, काश्मीरचे तात्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला त्यांना भेटण्यासाठी आले होते. मृदूला सिन्हा यांच्या ‘राजपथ से लोकपथ पर’ या पुस्तकात त्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

राजकारणात सक्रियमहाराणी गायत्री देवी या राजकारणात सक्रिय होत्या. त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजयही मिळवला होता. महिलांच्या अधिकारासाठीही त्यांनी खुप संघर्ष केला. महिलांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी जयपूरमध्ये शाळा सुरू केली. १९७५ मध्ये वोगनं त्यांना जगातील सर्वात सुंदर दहा महिलांच्या यादीत स्थान दिलं होतं. १९४० मध्ये त्यांचा विवाह महाराजा सवाई मानसिंह यांच्यासोबत झाला होता.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीIndiaभारत