शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

आमदाराचे घर असलेल्या किल्ल्यावरून नवा वाद, काय आहे इतिहास? ASI ने मागवला रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 19:16 IST

Ashraf ali Fort Dispute: उत्तर प्रदेशातील आमदाराच्या किल्ल्यावर राजपूत समुदायाने दावा केला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून, यासंदर्भात भारतीय पुरातत्व सर्व्हे विभागाने रिपोर्ट मागवला आहे. 

Ashraf ali Fort News: संभलनंतर आता उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील जलालाबाद तालुक्यातील मनहार खेडा किल्ल्यावर राजपूत समुदायाने दावा केला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे थानाभवन विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशरफ अली यांचे वडिलोपार्जित घर असलेल्या या किल्ल्यासंदर्भात भारतीय पुरातत्व सर्व्हे (ASI) विभागाला पत्र दिले आहे. यासंदर्भात आता ASI ने जिल्हा प्रशासनाला याबद्दलचा रिपोर्ट मागवला आहे. 

मनहार खेडा किल्ला वाद काय?

राष्ट्रीय लोकदलाचे थानाभवन मतदारसंघाचे आमदार अशरफ अली यांचे घर आहे. हे घर एका किल्ल्यात बनवलेले आहे. या किल्ल्याबद्दल आता वाद सुरू झाला आहे. राजपूत समुदायातील लोकांनी मनहार खेडा किल्ला नाव देऊन यासंदर्भात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केली. 

तक्रारदार भानु प्रताप सिंह यांनी सांगितले की, जलालाबादचे नाव पूर्वी मनहर खेडा होते. इथे माझ्या पूर्वजांचे शासन राहिलेले आहे. १६९० मध्ये जलाल खानने यावर कब्जा केला आणि माझ्या पूर्वजांना जेवणातून विष दिले. 

महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मारून टाकण्यात आले. हे गाव महानगर काळातील आहे. इथे पांडवांनी अज्ञातवासात असताना मुक्काम केला होता. इथे आर्चाय धुमय यांचा आश्रम होता. हा अतिप्राचीन किल्ला आहे, असा दावा भानु प्रताप सिंह यांनी केला आहे. 

सिंह यांच्यामते, १३५० मध्ये राजा धारूचे शासन होते. त्यानंतर करमचंद राजा बनले. करमचंदचे ७ मुले होती. त्यांनी आजूबाजूला १२ गावे वसवली, ती आजही आहेत. नंतर राजा बनलेल्या उदयभान सिंह यांची बिहारी सिंह, चंद्रभान सिंह, सरदार सिंह, भिक्कन सिंह आणि गोपाल सिंह ही मुले होती. मी राजा गोपाल सिंह यांच्या १६व्या पिढीचा वंशज आहे, असा दावा भानु प्रताप सिंह यांनी केला आहे. 

प्रशासनाने काय म्हटले आहे?

या प्रकरणावर बोलताना जिल्हाधिकारी हामीद हुसैन यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश पुरातत्व विभागाने एक रिपोर्ट मागितला होता. नकाशा आणि महसूल नोदींची माहिती पाठवण्यात आली आहे. पुढे काय कार्यवाही होईल, हे बघू. जेव्हा प्रकरण येईल, तेव्हा सगळ्यांची बाजू समजून घेतली जाईल. सध्या तरी फक्त रिपोर्ट मागितली गेला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणhistoryइतिहास