शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यकता भासल्यास पुन्हा नवे कृषी कायदे, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 07:06 IST

तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. 

भदोही : आवश्यकता भासल्यास पुन्हा नवे कृषी कायदे बनविणार असल्याचे वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी केले.  उत्तर प्रदेशातील भदोही येथे ते पत्रकारांशी बोलत होते. 

तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. 

त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर कलराज मिश्र म्हणाले की, तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अतिशय योग्य आहे. हे कायदे कसे फायदेशीर आहेत हे शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा केंद्राने आटोकाट प्रयत्न केला; पण त्यात यश आले नाही. हे कायदे रद्दच करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. त्यामुळे सरतेशेवटी केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला. 

कलराज मिश्र यांच्या आधी भाजपचे उन्नाव लोकसभा मतदारसंघातील खासदार साक्षी महाराज यांनी सांगितले होते की, काही वेळेस कायदे बनले तरी त्यांना विरोध झाल्यामुळे रद्द केले जातात. मग पुन्हा आवश्यकता भासल्यास तसेच कायदे पुन्हा केले जातात. अशा घटना होतच असतात. तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्यांपेक्षा देशाला जास्त महत्त्व दिले.

भाजप खासदाराची नापसंतीफरुखाबाद येथील भाजपचे खासदार मुकेश राजपूत यांनी कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल नापसंती दर्शविली होती. मोदी यांनी नाइलाजाने हा निर्णय घेतला असल्याचे राजपूत म्हणाले होते. अशीच भावना भाजपच्या आणखी काही खासदारांची असल्याचे समजते.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपा