शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

आवश्यकता भासल्यास पुन्हा नवे कृषी कायदे, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 07:06 IST

तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. 

भदोही : आवश्यकता भासल्यास पुन्हा नवे कृषी कायदे बनविणार असल्याचे वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी केले.  उत्तर प्रदेशातील भदोही येथे ते पत्रकारांशी बोलत होते. 

तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. 

त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर कलराज मिश्र म्हणाले की, तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अतिशय योग्य आहे. हे कायदे कसे फायदेशीर आहेत हे शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा केंद्राने आटोकाट प्रयत्न केला; पण त्यात यश आले नाही. हे कायदे रद्दच करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. त्यामुळे सरतेशेवटी केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला. 

कलराज मिश्र यांच्या आधी भाजपचे उन्नाव लोकसभा मतदारसंघातील खासदार साक्षी महाराज यांनी सांगितले होते की, काही वेळेस कायदे बनले तरी त्यांना विरोध झाल्यामुळे रद्द केले जातात. मग पुन्हा आवश्यकता भासल्यास तसेच कायदे पुन्हा केले जातात. अशा घटना होतच असतात. तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्यांपेक्षा देशाला जास्त महत्त्व दिले.

भाजप खासदाराची नापसंतीफरुखाबाद येथील भाजपचे खासदार मुकेश राजपूत यांनी कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल नापसंती दर्शविली होती. मोदी यांनी नाइलाजाने हा निर्णय घेतला असल्याचे राजपूत म्हणाले होते. अशीच भावना भाजपच्या आणखी काही खासदारांची असल्याचे समजते.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपा