शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

काश्मीरच्या दर्जाबाबत निर्णय घेतला जाईल, ही निव्वळ अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 06:44 IST

राज्यपाल सत्यपाल मलिक; काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाबाबत एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल, अशी अफवा उठविण्यात आली असून, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे. निमलष्करी दलाचे आणखी दहा हजार जवान काश्मीरमध्ये पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर समाजमाध्यमांत या निर्णयाविषयी अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेणार असून त्यामुळे त्या राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्राने वाढीव कुमक तिथे पाठविली आहे अशा आशयाचे संदेश समाजमाध्यमांवर झळकले. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. काश्मीरमधील स्थिती सुरळीत असून राज्याच्या दर्जाबाबत कोणताही निर्णय होणार नसल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३५-अ कलम रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काश्मीरसंदर्भात काही केंद्रीय खाती व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन तीन दिवसांत जे आदेश दिले त्यामुळे या चर्चेत भरच पडली. काश्मीरमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील चार महिने पुरेल इतका धान्यसाठा करून ठेवा असे आदेश रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जवानांना दिले होते.आदेशांमुळे गोंधळात भरश्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी पाच परिक्षेत्रांतील पोलीस अधीक्षकांना आदेश दिला की, या अधिकाºयांनी आपापल्या हद्दीतील मशीदी व त्यांच्या व्यवस्थापन समित्यांमधील सदस्यांची माहिती तातडीने कळवावी. या आदेशांमुळे काश्मीरमध्ये आगामी काळात नेमके काय होणार आहे याबद्दल प्रत्येकाचीच उत्सुकता ताणली गेली, तर मशिदी व त्यांच्या व्यवस्थापन समित्यांमधील सदस्यांची माहिती गोळा करणे हा नेहमीच्या कामाचा भाग आहे, असे श्रीनगरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा