शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या दर्जाबाबत निर्णय घेतला जाईल, ही निव्वळ अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 06:44 IST

राज्यपाल सत्यपाल मलिक; काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाबाबत एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल, अशी अफवा उठविण्यात आली असून, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे. निमलष्करी दलाचे आणखी दहा हजार जवान काश्मीरमध्ये पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर समाजमाध्यमांत या निर्णयाविषयी अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेणार असून त्यामुळे त्या राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्राने वाढीव कुमक तिथे पाठविली आहे अशा आशयाचे संदेश समाजमाध्यमांवर झळकले. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. काश्मीरमधील स्थिती सुरळीत असून राज्याच्या दर्जाबाबत कोणताही निर्णय होणार नसल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३५-अ कलम रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काश्मीरसंदर्भात काही केंद्रीय खाती व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन तीन दिवसांत जे आदेश दिले त्यामुळे या चर्चेत भरच पडली. काश्मीरमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील चार महिने पुरेल इतका धान्यसाठा करून ठेवा असे आदेश रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जवानांना दिले होते.आदेशांमुळे गोंधळात भरश्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी पाच परिक्षेत्रांतील पोलीस अधीक्षकांना आदेश दिला की, या अधिकाºयांनी आपापल्या हद्दीतील मशीदी व त्यांच्या व्यवस्थापन समित्यांमधील सदस्यांची माहिती तातडीने कळवावी. या आदेशांमुळे काश्मीरमध्ये आगामी काळात नेमके काय होणार आहे याबद्दल प्रत्येकाचीच उत्सुकता ताणली गेली, तर मशिदी व त्यांच्या व्यवस्थापन समित्यांमधील सदस्यांची माहिती गोळा करणे हा नेहमीच्या कामाचा भाग आहे, असे श्रीनगरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा