शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

काश्मीरच्या दर्जाबाबत निर्णय घेतला जाईल, ही निव्वळ अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 06:44 IST

राज्यपाल सत्यपाल मलिक; काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाबाबत एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल, अशी अफवा उठविण्यात आली असून, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे. निमलष्करी दलाचे आणखी दहा हजार जवान काश्मीरमध्ये पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर समाजमाध्यमांत या निर्णयाविषयी अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेणार असून त्यामुळे त्या राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्राने वाढीव कुमक तिथे पाठविली आहे अशा आशयाचे संदेश समाजमाध्यमांवर झळकले. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. काश्मीरमधील स्थिती सुरळीत असून राज्याच्या दर्जाबाबत कोणताही निर्णय होणार नसल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३५-अ कलम रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काश्मीरसंदर्भात काही केंद्रीय खाती व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन तीन दिवसांत जे आदेश दिले त्यामुळे या चर्चेत भरच पडली. काश्मीरमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील चार महिने पुरेल इतका धान्यसाठा करून ठेवा असे आदेश रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जवानांना दिले होते.आदेशांमुळे गोंधळात भरश्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी पाच परिक्षेत्रांतील पोलीस अधीक्षकांना आदेश दिला की, या अधिकाºयांनी आपापल्या हद्दीतील मशीदी व त्यांच्या व्यवस्थापन समित्यांमधील सदस्यांची माहिती तातडीने कळवावी. या आदेशांमुळे काश्मीरमध्ये आगामी काळात नेमके काय होणार आहे याबद्दल प्रत्येकाचीच उत्सुकता ताणली गेली, तर मशिदी व त्यांच्या व्यवस्थापन समित्यांमधील सदस्यांची माहिती गोळा करणे हा नेहमीच्या कामाचा भाग आहे, असे श्रीनगरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा