शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

भारताच्या नव्या नकाशास आता नेपाळचाही आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 05:56 IST

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले की

काठमांडू/नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या फेररचनेनंतर देशातील २८ राज्ये व नऊ केंद्रशासित प्रदेश दाखविणाऱ्या भारताने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या नव्या राजकीय नकाशास पाकिस्तान व चीननंतर आता नेपाळनेही आक्षेप घेतला आहे. भारताने मात्र हा आक्षेप फेटाळून लावला आहे.

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले की, आमच्या देशाच्या अगदी पश्चिम टोकाला असलेला कालापाणी हा प्रदेश भारताने आपल्या हद्दीत दाखविला आहे. कालापाणी आमचेच असल्याने नकाशात दाखविलेल्या सीमांना आमचा आक्षेप आहे. दोन्ही देशांचा सीमावाद सोडविण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा करण्याची स्थायी यंत्रणा आहे. भारताने त्याचा आदर करावा, अशी अपेक्षा आहे. नेपाळच्या म्हणण्यानुसार कालापाणी त्यांच्या दारचुला जिल्ह्यात आहे; पण नव्या नकाशात भारताने ते उत्तराखंडच्या पिठोरगढ जिल्ह्यात दाखविले आहे. (वृत्तसंस्था)सीमेत फेरबदल नाहीनेपाळचा हा आक्षेप अमान्य करताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, नकाशात भारताचा सार्वभौम प्रदेश अचूकपणे दाखविलेला आहे. नव्या नकाशात भारत व नेपाळ यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेत कोणताही फेरबदल केलेला नाही.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNepalनेपाळIndiaभारत