शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

पराभव ना भारताचा, ना पाकिस्तानचा; यात विजय अमेरिकेचा, आशियाई देशात हस्तक्षेप धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 08:29 IST

भारत-पाकिस्तान यांच्यातील तिढा किंवा युद्ध हे अमेरिका, संयुक्त राष्ट्र किंवा रशिया यांच्या मध्यस्थीशिवाय संपूच शकलेले नाही. ही बाब भारत-पाकिस्तान आणि दक्षिण आशियाई देशाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे.

डॉ. रोहन चौधरी, जेएनयू विद्यापीठ:  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान या दोन देशांत तणावाची स्थिती निर्माण झाली. परिणामी दोन्ही देशांतील नागरिकांनी युद्धजन्य स्थितीचा अनुभव घेत होते. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत-पाकिस्तान या दोन देशांत पुन्हा एकदा शस्रसंधी झाली. शनिवारी सायंकाळी युद्ध थांबवण्यात आल्याची घोषणा झाली.

आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टीने १९४७ पासूनच्या संघर्षाचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, भारत-पाकिस्तान यांच्यातील तिढा किंवा युद्ध हे अमेरिका, संयुक्त राष्ट्र किंवा रशिया यांच्या मध्यस्थीशिवाय संपूच शकलेले नाही. ही बाब भारत-पाकिस्तान आणि दक्षिण आशियाई देशाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे. यातून एक गोष्ट अधोरेखित होते की, आशियाई देश आपापसातील लढे किंवा प्रश्न स्वतःच सोडवू शकत नाहीत. इतर राष्ट्राची मध्यस्थी आणि त्यातून होणारा हस्तक्षेप हे दक्षिण आशियाई राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि एकंदरीत दक्षिण आशियाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरते. तसेच, आपण आपापसातील संघर्ष सामंजस्याने, वाटाघाटीने किंवा बळाचा वापर करून साडवू शकत नसू, तर भविष्य काळात बलाढ्य देशांचे हस्तक्षेप वाढतील. त्याचे परिणाम आपण भोगलेले आहेतच, भविष्यकाळातही भोगावे लागतील. यात देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येईल.

डोनाल्ड ट्रम्पसारखा माणूस तो मध्यस्थी करतो, तेव्हा तो निश्चितच दक्षिण आशियात शांतता राहिल, हे पाहण्यापेक्षा स्वतःचे हित जोपासण्याचा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. या हिताची व्याप्ती आणि परिणाम काय होईल, याबाबत अनिश्चितता असली तरी अशा प्रकारचा हस्तक्षेप हा कायमच धोकादायक असतो. यातून पुन्हा एकदा दक्षिण आशियाई देशांच्या मर्यादा लक्षात येतील. या युद्धातून ना भारताचा पराभव झाला, ना पाकिस्तानचा पराभव झाला.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदी