शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पराभव ना भारताचा, ना पाकिस्तानचा; यात विजय अमेरिकेचा, आशियाई देशात हस्तक्षेप धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 08:29 IST

भारत-पाकिस्तान यांच्यातील तिढा किंवा युद्ध हे अमेरिका, संयुक्त राष्ट्र किंवा रशिया यांच्या मध्यस्थीशिवाय संपूच शकलेले नाही. ही बाब भारत-पाकिस्तान आणि दक्षिण आशियाई देशाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे.

डॉ. रोहन चौधरी, जेएनयू विद्यापीठ:  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान या दोन देशांत तणावाची स्थिती निर्माण झाली. परिणामी दोन्ही देशांतील नागरिकांनी युद्धजन्य स्थितीचा अनुभव घेत होते. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत-पाकिस्तान या दोन देशांत पुन्हा एकदा शस्रसंधी झाली. शनिवारी सायंकाळी युद्ध थांबवण्यात आल्याची घोषणा झाली.

आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टीने १९४७ पासूनच्या संघर्षाचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, भारत-पाकिस्तान यांच्यातील तिढा किंवा युद्ध हे अमेरिका, संयुक्त राष्ट्र किंवा रशिया यांच्या मध्यस्थीशिवाय संपूच शकलेले नाही. ही बाब भारत-पाकिस्तान आणि दक्षिण आशियाई देशाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे. यातून एक गोष्ट अधोरेखित होते की, आशियाई देश आपापसातील लढे किंवा प्रश्न स्वतःच सोडवू शकत नाहीत. इतर राष्ट्राची मध्यस्थी आणि त्यातून होणारा हस्तक्षेप हे दक्षिण आशियाई राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि एकंदरीत दक्षिण आशियाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरते. तसेच, आपण आपापसातील संघर्ष सामंजस्याने, वाटाघाटीने किंवा बळाचा वापर करून साडवू शकत नसू, तर भविष्य काळात बलाढ्य देशांचे हस्तक्षेप वाढतील. त्याचे परिणाम आपण भोगलेले आहेतच, भविष्यकाळातही भोगावे लागतील. यात देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येईल.

डोनाल्ड ट्रम्पसारखा माणूस तो मध्यस्थी करतो, तेव्हा तो निश्चितच दक्षिण आशियात शांतता राहिल, हे पाहण्यापेक्षा स्वतःचे हित जोपासण्याचा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. या हिताची व्याप्ती आणि परिणाम काय होईल, याबाबत अनिश्चितता असली तरी अशा प्रकारचा हस्तक्षेप हा कायमच धोकादायक असतो. यातून पुन्हा एकदा दक्षिण आशियाई देशांच्या मर्यादा लक्षात येतील. या युद्धातून ना भारताचा पराभव झाला, ना पाकिस्तानचा पराभव झाला.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदी