शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

पराभव ना भारताचा, ना पाकिस्तानचा; यात विजय अमेरिकेचा, आशियाई देशात हस्तक्षेप धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 08:29 IST

भारत-पाकिस्तान यांच्यातील तिढा किंवा युद्ध हे अमेरिका, संयुक्त राष्ट्र किंवा रशिया यांच्या मध्यस्थीशिवाय संपूच शकलेले नाही. ही बाब भारत-पाकिस्तान आणि दक्षिण आशियाई देशाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे.

डॉ. रोहन चौधरी, जेएनयू विद्यापीठ:  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान या दोन देशांत तणावाची स्थिती निर्माण झाली. परिणामी दोन्ही देशांतील नागरिकांनी युद्धजन्य स्थितीचा अनुभव घेत होते. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत-पाकिस्तान या दोन देशांत पुन्हा एकदा शस्रसंधी झाली. शनिवारी सायंकाळी युद्ध थांबवण्यात आल्याची घोषणा झाली.

आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टीने १९४७ पासूनच्या संघर्षाचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, भारत-पाकिस्तान यांच्यातील तिढा किंवा युद्ध हे अमेरिका, संयुक्त राष्ट्र किंवा रशिया यांच्या मध्यस्थीशिवाय संपूच शकलेले नाही. ही बाब भारत-पाकिस्तान आणि दक्षिण आशियाई देशाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे. यातून एक गोष्ट अधोरेखित होते की, आशियाई देश आपापसातील लढे किंवा प्रश्न स्वतःच सोडवू शकत नाहीत. इतर राष्ट्राची मध्यस्थी आणि त्यातून होणारा हस्तक्षेप हे दक्षिण आशियाई राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि एकंदरीत दक्षिण आशियाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरते. तसेच, आपण आपापसातील संघर्ष सामंजस्याने, वाटाघाटीने किंवा बळाचा वापर करून साडवू शकत नसू, तर भविष्य काळात बलाढ्य देशांचे हस्तक्षेप वाढतील. त्याचे परिणाम आपण भोगलेले आहेतच, भविष्यकाळातही भोगावे लागतील. यात देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येईल.

डोनाल्ड ट्रम्पसारखा माणूस तो मध्यस्थी करतो, तेव्हा तो निश्चितच दक्षिण आशियात शांतता राहिल, हे पाहण्यापेक्षा स्वतःचे हित जोपासण्याचा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. या हिताची व्याप्ती आणि परिणाम काय होईल, याबाबत अनिश्चितता असली तरी अशा प्रकारचा हस्तक्षेप हा कायमच धोकादायक असतो. यातून पुन्हा एकदा दक्षिण आशियाई देशांच्या मर्यादा लक्षात येतील. या युद्धातून ना भारताचा पराभव झाला, ना पाकिस्तानचा पराभव झाला.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदी