शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 08:17 IST

माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय हवाई दलाकडे सध्या लढाऊ विमानांचे २९ स्क्वाड्रन आहेत. त्यांना ४२ स्क्वॉड्रनची आवश्यकता आहे...

ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण जगाला भारताच्या ताकदीचा परिचय झाला. या ऑपरेशनदरम्यान भारतीय हवाई दलाने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आणि पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. आता हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, भारतीय हवाई दलाने आणखी राफेल लढाऊ विमानांची मागणी केली आहे.

भारतीय हवाई दलाने फायटर स्क्वॉड्रनची कमतरता भरून काढण्यासाठी एमआरएफए प्रोजेक्टअंतर्गत आणखी राफेलची मागणी केली आहे. महत्वाचे म्हणजे, हवाई दलाने ११४ मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट अर्थात बहुउद्देशीय लढाऊ विमाने (MRFA) खरेदीसंदर्भात आपले मत मांडले आहे. यामुळे यासाठी फ्रान्स आणि भारत सरकार यांच्यात करार होऊ शकतो.

भारतीय हवाई दलाची ताकद...? -माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय हवाई दलाकडे सध्या लढाऊ विमानांचे २९ स्क्वाड्रन आहेत. त्यांना ४२ स्क्वॉड्रनची आवश्यकता आहे. याशिवाय पाकिस्तानचा विचार करता, त्यांच्याकडे एकूण २५ स्क्वॉड्रन आहेत. तर, चीनचा विचार करता, त्यांच्याकडे ६६ स्क्वॉड्रन आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाकिस्तान आणि चीनकडे पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने आहेत. तर भारताकडे राफेल हे सर्वात आधुनिक लढाऊ विमान आहे, हे विमान ४.५ व्या पिढीचे लढाऊ विमानं मानले जाते. मात्र असे असले तरी, भारतीय हवाई दल पाकिस्तानवर भारी पडले.

तत्पूर्वी, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या दरम्यान, भारतीय हवाई दलाने शंभराहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पाकिस्तानचे हवाई तळही उद्ध्वस्त केले. याशिवाय, पाकिस्ताननेही भारताच्या अनेक ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र, भारतीय हवाई दलाने तो पार हाणून पाडला. आता लवकरच भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलRafale Dealराफेल डीलFranceफ्रान्सOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान