शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

नेहरू विचार हाच काँग्रेसचा वारसा

By admin | Updated: May 28, 2014 03:13 IST

पंडित जवाहरलाल नेहरू यांची खरी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी अर्थशास्त्र हीच काँग्रेसची मूळ विचारधारा आणि वारसा

नवी दिल्ली : पंडित जवाहरलाल नेहरू यांची खरी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी अर्थशास्त्र हीच काँग्रेसची मूळ विचारधारा आणि वारसा असून, नेहरूवादातील या मूल्यांना सध्याच्या राजकीय वातावरणात आव्हान दिले जात आहे, असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. नेहरूंच्या ५० व्या पुण्यतिथी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व अपयशानंतर प्रथमच त्यांनी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. समाजातील सर्वात कमकुवत घटकांबाबत नेहरूंनी व्यक्त केलेल्या चिंतेलाही काँग्रेसने महत्त्व दिले आहे. लोकशाही संस्थांची उभारणी, खरी धर्मनिरपेक्षता, समाजवादी अर्थशास्त्र तसेच तटस्थ परराष्टÑ धोरण हे नेहरूवादाचे चार स्तंभ भारतीय विचारधारेचे अविभाज्य अंग राहिले आहेत. सध्याच्या राजकीय वातावरणात काही लोकांकडून या विचारांना आव्हान दिले जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ५० वर्षांपूर्वीच्या नेहरूवादी पारंपरिक विचारांचीच कास धरण्याचे कारण सध्या काँग्रेस काळाच्या फेर्‍यात अडकली आहे, असा होत नाही. खुली आणि प्रश्न उपस्थित करणारी बुद्धी असणार्‍या नेहरूंनी काळाच्या ओघातही हेच धोरण विकसित केले असले तरी त्यांचे हेच मूळ विचार कायम राहिले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला असतानाच सोनिया गांधींनी मध्य-वाम विचारधारेचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. कॉर्पोरेट जगत आणि प्रसिद्धी माध्यमांचे पूर्ण समर्थन लाभल्यानेच भाजपला स्पष्ट बहुमत मिळवता आले, असा सूर काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत लागला असताना प्रथमच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांच्या उपस्थितीत सोनिया गांधी यांनी ठाम भूमिका मांडली. नेहरू फाळणी टाळण्यासाठी उभे ठाकले होते. देशाचे विभाजन झाल्यानंतरही भारतातील मुस्लिमांसाठी पाकिस्तानची निर्मिती झाल्याचा आणि उर्वरित भाग हिंदू राष्टÑ असल्याचा तर्क त्यांना मान्य नव्हता. सर्व जाती, धर्म, वंश आणि भाषा मिळून भारत उभा राहावा, हाच त्यांचा विचार होता. त्यांच्या या मूळ विचारांवरच अ.भा. काँग्रेस उभी राहिली आहे, असेही त्या म्हणाल्या.