शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

टॅटूवाली प्रेयसी, हत्या आणि 8 वर्षानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 10:31 IST

आरोपी राजूने हत्या केल्यानंतर रोहन दहिया नावने गुडगावमध्ये वास्तव्य करु लागला. तेथील स्थानिक कंपनीत तो जॉब करत होता. पोलिसांनी राजूच्या कुटुंबांना त्याच्या मृत्यूची बातमी दिली तेव्हा त्यांनी सुरुवातीला त्याला ओळखण्यास नकार दिला

नवी दिल्ली - गुन्हेगाराने कितीही गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला तरी कायद्याच्या कचाट्यात तो सापडतोच. मात्र दिल्लीमध्ये प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह दिल्ली रेल्वे स्टेशनवर ठेऊन पसार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी कायद्याचे हात कमी पडल्याचं दिसून आलं. आरोपीच्या मृत्यूपर्यंत तो पोलिसांपासून वाचून राहिला. या हत्येतील आरोपी आपली ओळख बदलून राजधानीजवळील गुडगावमध्ये जॉब करत होता. पोलिसांनी 8 वर्षानंतर त्याचा मृतदेह मिळाला. 11 फेब्रुवारी 2011 मध्ये राजूने नीतूची हत्या केली. तिचा मृतदेह एका बॅगेत भरुन दिल्ली रेल्वे स्टेशनवर ठेऊन पसार झाला. 

आरोपी राजूने हत्या केल्यानंतर रोहन दहिया नावने गुडगावमध्ये वास्तव्य करु लागला. तेथील स्थानिक कंपनीत तो जॉब करत होता. पोलिसांनी राजूच्या कुटुंबांना त्याच्या मृत्यूची बातमी दिली तेव्हा त्यांनी सुरुवातीला त्याला ओळखण्यास नकार दिला मात्र त्यानंतर त्याचा काका रणसिंह गहलोत यांनी ओळख पटवून दिली. 

राजू गहलोत आणि नीतू सोलंकी हे 2010 मध्ये एकत्र आले. दोघांच्या लग्नाला घरातून विरोध होत असल्याने एकमेकांपासून दूर जाऊ ही भीती कायम त्यांच्या मनात होती. कायद्याची पदवी घेतल्यानंतर नीतूने मार्च 2010 मध्ये नातेवाईकांना सिंगापूरमध्ये जॉब लागल्याचा बहाणा करुन गायब झाली. राजूने एप्रिल 2010 मध्ये एअर इंडियाचा जॉब सोडला. तेव्हापासून हे दोघे मुंबई, गोवा आणि बंगळुरु याठिकाणी वास्तव्य करत होते. 

8 वर्ष गुन्हे शाखेकडून नीतूच्या हत्येचा आरोप असलेला आरोपी राजूला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु होते. 25 जून रोजी त्याचा शोध पोलिसांना लागला. त्यावेळी आरोपी राजू गुडगावमधील हॉस्पिटलमध्ये लीवरच्या आजारावर उपचार घेत असताना मृत्यू झाला. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार 11 फेब्रुवारी 2011 रोजी दिल्ली स्टेशनवर मिळालेल्या बॅगेत मुलीचा मृतदेह मिळाला. मृतदेहाच्या कमरेला मोर पंखाचा टॅटू बनविला होता. या टॅटूच्या आधारावर मुलीची 15 दिवसानंतर ओळख पटली. त्यानंतर खूप शोधलं तरीही पोलिसांना राजू सापडला नाही. राजू आणि नीतूमध्ये पैशांच्या कारणावरुन वाद सुरु होते. या वादातूनच राजूने नीतूची हत्या केली. सूत्रांच्या माहितीनुसार काम सोडल्यानंतर राजू चोरी आणि ब्लॅकमेलिंगसारखे गुन्हे करु लागला. त्यामुळे नीतू राजूवर नाराज होती. त्यावरुन राजू आणि नीतूमध्ये वारंवार भांडण होत असे. याच भांडणांचे रुपांतर हत्येत झालं. 

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या 10 मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत राजू गहलोतचा समावेश होता. अनेकदा राजूला पकडण्यासाठी पोलिस यंत्रणेने त्याचा पाठलाग केला. मात्र नेहमीच तो चकमा देऊन पळून गेला. राजू गोव्याला असलेली माहिती मिळाल्यानंतर दोन-तीन महिने गोव्यात पोलीस त्याचा शोध घेत होती. एकदा मुंबईतील कल्याण येथून राजूचा त्याचा भावाला फोन आला त्यावेळीही आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस मुंबईला आली. मात्र तेथूनही राजू फरार झाला होता. वारंवार ठिकाणं बदलल्यामुळे राजूचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं मात्र 25 जून 2019 रोजी गुडगावच्या हॉस्पिटलमधून राजूच्या घरी कॉल आला तेव्हा त्याच्या कुटुंबातून एकाने पोलिसांना माहिती दिली. पण जेव्हा पोलीस राजूला पकडण्यासाठी हॉस्पिटलला पोहचली त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस