शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

टॅटूवाली प्रेयसी, हत्या आणि 8 वर्षानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 10:31 IST

आरोपी राजूने हत्या केल्यानंतर रोहन दहिया नावने गुडगावमध्ये वास्तव्य करु लागला. तेथील स्थानिक कंपनीत तो जॉब करत होता. पोलिसांनी राजूच्या कुटुंबांना त्याच्या मृत्यूची बातमी दिली तेव्हा त्यांनी सुरुवातीला त्याला ओळखण्यास नकार दिला

नवी दिल्ली - गुन्हेगाराने कितीही गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला तरी कायद्याच्या कचाट्यात तो सापडतोच. मात्र दिल्लीमध्ये प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह दिल्ली रेल्वे स्टेशनवर ठेऊन पसार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी कायद्याचे हात कमी पडल्याचं दिसून आलं. आरोपीच्या मृत्यूपर्यंत तो पोलिसांपासून वाचून राहिला. या हत्येतील आरोपी आपली ओळख बदलून राजधानीजवळील गुडगावमध्ये जॉब करत होता. पोलिसांनी 8 वर्षानंतर त्याचा मृतदेह मिळाला. 11 फेब्रुवारी 2011 मध्ये राजूने नीतूची हत्या केली. तिचा मृतदेह एका बॅगेत भरुन दिल्ली रेल्वे स्टेशनवर ठेऊन पसार झाला. 

आरोपी राजूने हत्या केल्यानंतर रोहन दहिया नावने गुडगावमध्ये वास्तव्य करु लागला. तेथील स्थानिक कंपनीत तो जॉब करत होता. पोलिसांनी राजूच्या कुटुंबांना त्याच्या मृत्यूची बातमी दिली तेव्हा त्यांनी सुरुवातीला त्याला ओळखण्यास नकार दिला मात्र त्यानंतर त्याचा काका रणसिंह गहलोत यांनी ओळख पटवून दिली. 

राजू गहलोत आणि नीतू सोलंकी हे 2010 मध्ये एकत्र आले. दोघांच्या लग्नाला घरातून विरोध होत असल्याने एकमेकांपासून दूर जाऊ ही भीती कायम त्यांच्या मनात होती. कायद्याची पदवी घेतल्यानंतर नीतूने मार्च 2010 मध्ये नातेवाईकांना सिंगापूरमध्ये जॉब लागल्याचा बहाणा करुन गायब झाली. राजूने एप्रिल 2010 मध्ये एअर इंडियाचा जॉब सोडला. तेव्हापासून हे दोघे मुंबई, गोवा आणि बंगळुरु याठिकाणी वास्तव्य करत होते. 

8 वर्ष गुन्हे शाखेकडून नीतूच्या हत्येचा आरोप असलेला आरोपी राजूला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु होते. 25 जून रोजी त्याचा शोध पोलिसांना लागला. त्यावेळी आरोपी राजू गुडगावमधील हॉस्पिटलमध्ये लीवरच्या आजारावर उपचार घेत असताना मृत्यू झाला. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार 11 फेब्रुवारी 2011 रोजी दिल्ली स्टेशनवर मिळालेल्या बॅगेत मुलीचा मृतदेह मिळाला. मृतदेहाच्या कमरेला मोर पंखाचा टॅटू बनविला होता. या टॅटूच्या आधारावर मुलीची 15 दिवसानंतर ओळख पटली. त्यानंतर खूप शोधलं तरीही पोलिसांना राजू सापडला नाही. राजू आणि नीतूमध्ये पैशांच्या कारणावरुन वाद सुरु होते. या वादातूनच राजूने नीतूची हत्या केली. सूत्रांच्या माहितीनुसार काम सोडल्यानंतर राजू चोरी आणि ब्लॅकमेलिंगसारखे गुन्हे करु लागला. त्यामुळे नीतू राजूवर नाराज होती. त्यावरुन राजू आणि नीतूमध्ये वारंवार भांडण होत असे. याच भांडणांचे रुपांतर हत्येत झालं. 

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या 10 मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत राजू गहलोतचा समावेश होता. अनेकदा राजूला पकडण्यासाठी पोलिस यंत्रणेने त्याचा पाठलाग केला. मात्र नेहमीच तो चकमा देऊन पळून गेला. राजू गोव्याला असलेली माहिती मिळाल्यानंतर दोन-तीन महिने गोव्यात पोलीस त्याचा शोध घेत होती. एकदा मुंबईतील कल्याण येथून राजूचा त्याचा भावाला फोन आला त्यावेळीही आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस मुंबईला आली. मात्र तेथूनही राजू फरार झाला होता. वारंवार ठिकाणं बदलल्यामुळे राजूचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं मात्र 25 जून 2019 रोजी गुडगावच्या हॉस्पिटलमधून राजूच्या घरी कॉल आला तेव्हा त्याच्या कुटुंबातून एकाने पोलिसांना माहिती दिली. पण जेव्हा पोलीस राजूला पकडण्यासाठी हॉस्पिटलला पोहचली त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस