योग काळाची गरज: पालकमंत्री
By Admin | Updated: June 22, 2015 01:54 IST2015-06-22T01:54:10+5:302015-06-22T01:54:10+5:30
सोलापूर :

योग काळाची गरज: पालकमंत्री
स लापूर :मन आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी योग काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले.काडादी हायस्कूलच्या मैदानावर आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित योग शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रा. अशोक निंबर्गी, अश्विनी रुग्णालयाचे चेअरमन बिपीनभाई पटेल, ब्रिजमोहन फोफलिया, राजेंद्र काटवे, डॉ. राजेंद्र घुली, प्रा. नसीम पठाण, संस्थेच्या पदाधिकारी सिंधूताई काडादी, अस्मिता गायकवाड, संजय कोळी, सुनील रिक्के, चंद्रिका चौहान, मुख्याध्यापक अनिल पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतानाच आगामी काळात योग शिबीर आयोजित करणार असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, नेहरु युवा केंद्राच्या वतीने येथील पार्क मैदानावर योग दिवस समन्वय समिती, विवेकानंद केंद्र, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योगपीठ सोलापूर शाखेच्या वतीनेही महायोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सोलापूरचे उपमहापौर प्रवीण डोंगरे, सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. इरेश स्वामी, नेहरु युचा केंद्राचे समन्वयक प्रमोद हिंगे, योग दिवस समन्वय समितीचे निमंत्रक मनमोहन भुतडा, संयोजन संघटनांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शहरातील विविध शाळा, संस्था संघटनांतर्फे शहर व जिल्ात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात आले. सर्वत्र अतिशय उत्साहात नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)