शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक, रामदेवबाबांच्या वक्तव्याला गिरिराज सिंहांचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 14:03 IST

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र...

बेगुसराय - लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही आहे. बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा खासदार गिरिराज सिंह यांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत योगगुरू रामदेब बाबा यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.  तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक असल्याचेही गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे. तिसऱ्या अपत्याला मताधिकार आणि सरकारी नोकऱ्यांपासून वंचित करण्यात यावे, असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी दिला होता. दरम्यान, गिरिराज सिंह यांनी रामदेव बाबांच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे. ''रामदेव बाबांच्या वक्तव्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले पाहिजे. तसेच देशाच्या विकासासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची आवश्यकता आहे.'' असे गिरिराज सिंह यांनी सांगितले. दरम्यान, रामदेवबाबांनी केलेल्या वक्तव्याबाबत ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकांना असंवैधानिक गोष्टी बोलण्यापासून रोखण्यासाठी कुठलाही स्पष्ट कायदा नाही आहे. मात्र रामदेवबाबांच्या विचारांना अकारण महत्त्व दिले जाते., असे ओवेसी म्हणाले होते. हरिद्वार येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी देशाची लोकसंख्या दीडशे कोटींच्यावर जाऊ देता कामा नये. तिसऱ्या अपत्याला मताधिकार आणि सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवणारा कायदा झाला तरच हे शक्य होईल, असे सांगितले होते.  

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाPoliticsराजकारण