शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक, रामदेवबाबांच्या वक्तव्याला गिरिराज सिंहांचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 14:03 IST

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र...

बेगुसराय - लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही आहे. बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा खासदार गिरिराज सिंह यांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत योगगुरू रामदेब बाबा यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.  तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक असल्याचेही गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे. तिसऱ्या अपत्याला मताधिकार आणि सरकारी नोकऱ्यांपासून वंचित करण्यात यावे, असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी दिला होता. दरम्यान, गिरिराज सिंह यांनी रामदेव बाबांच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे. ''रामदेव बाबांच्या वक्तव्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले पाहिजे. तसेच देशाच्या विकासासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची आवश्यकता आहे.'' असे गिरिराज सिंह यांनी सांगितले. दरम्यान, रामदेवबाबांनी केलेल्या वक्तव्याबाबत ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकांना असंवैधानिक गोष्टी बोलण्यापासून रोखण्यासाठी कुठलाही स्पष्ट कायदा नाही आहे. मात्र रामदेवबाबांच्या विचारांना अकारण महत्त्व दिले जाते., असे ओवेसी म्हणाले होते. हरिद्वार येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी देशाची लोकसंख्या दीडशे कोटींच्यावर जाऊ देता कामा नये. तिसऱ्या अपत्याला मताधिकार आणि सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवणारा कायदा झाला तरच हे शक्य होईल, असे सांगितले होते.  

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाPoliticsराजकारण