शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

75th Independence Day : जेलमधील गुन्हेगारांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'या' कैद्यांची करणार सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 21:01 IST

या विशेष योजनेत गंभीर गुन्ह्यांतील कैद्यांना माफी मिळणार नाही. त्यांना न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीच लागणार...

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi) देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' म्हणून उत्साहात साजरा करत आहे. हे वर्ष विशेष बनविण्यासाठी मोदी सरकारने जेलमध्ये बंद असलेल्या कैद्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

तीन टप्प्यांत होणार सुटका - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने (Narendra Modi) देशभरातील कारागृहांमध्ये असलेल्या काही श्रेणीतील कैद्यांना 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'निमित्त विशेष माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची सुटका तीन टप्प्यांत करण्यात येईल.

पहिला टप्पा 15 ऑगस्ट 2022 -या योजनेत पहिला टप्पा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी असेल. त्या दिवशी काही श्रेणीतील कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल. दुसरा टप्पा 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त असेल. तर तिसरा आणि अखेरचा टप्पा 15 ऑगस्ट 2023 रोजी असेल. या दिवशीही अनेक कैद्यांना माफी मिळेल आणि त्यांची कारागृहातून सुटका करण्यात येईल. 

खरे तर, कारागृहात चांगले आचरण असणाऱ्या कैद्यांना प्रोत्साहन देणे, असा या योजनेचा उद्देश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष योजनेत गंभीर गुन्ह्यांतील कैद्यांना माफी मिळणार नाही. त्यांना न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीच लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानjailतुरुंगBJPभाजपाCourtन्यायालय