शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

75th Independence Day : जेलमधील गुन्हेगारांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'या' कैद्यांची करणार सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 21:01 IST

या विशेष योजनेत गंभीर गुन्ह्यांतील कैद्यांना माफी मिळणार नाही. त्यांना न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीच लागणार...

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi) देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' म्हणून उत्साहात साजरा करत आहे. हे वर्ष विशेष बनविण्यासाठी मोदी सरकारने जेलमध्ये बंद असलेल्या कैद्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

तीन टप्प्यांत होणार सुटका - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने (Narendra Modi) देशभरातील कारागृहांमध्ये असलेल्या काही श्रेणीतील कैद्यांना 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'निमित्त विशेष माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची सुटका तीन टप्प्यांत करण्यात येईल.

पहिला टप्पा 15 ऑगस्ट 2022 -या योजनेत पहिला टप्पा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी असेल. त्या दिवशी काही श्रेणीतील कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल. दुसरा टप्पा 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त असेल. तर तिसरा आणि अखेरचा टप्पा 15 ऑगस्ट 2023 रोजी असेल. या दिवशीही अनेक कैद्यांना माफी मिळेल आणि त्यांची कारागृहातून सुटका करण्यात येईल. 

खरे तर, कारागृहात चांगले आचरण असणाऱ्या कैद्यांना प्रोत्साहन देणे, असा या योजनेचा उद्देश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष योजनेत गंभीर गुन्ह्यांतील कैद्यांना माफी मिळणार नाही. त्यांना न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीच लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानjailतुरुंगBJPभाजपाCourtन्यायालय