शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

 बिहारमध्ये एनडीए फुटीच्या उंबरठ्यावर? उपेंद्र कुशवाहा भाजपावर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 15:50 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपाध्यक्ष अमित शाह एनडीएमधील मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतानाचा बिहारमध्ये एनडीएमधील ऐक्याला तडे जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

नवी दिल्ली  - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपाध्यक्ष अमित शाह एनडीएमधील मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतानाचा बिहारमध्ये एनडीएमधील ऐक्याला तडे जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. गुरुवारी संध्याकाळी पाटणा येथे एनडीएमधील मित्रपक्षांसाठी मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या मेजवानीस केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा हे अनुपस्थित राहणार आहेत. तर संयुक्त जनता दलाकडूनही जागावाटपामध्ये 25 जागांसाठी आग्रह होत असल्याने राज्यात एनडीए फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

सुमारे आठ वर्षांनंतप बिहारमध्ये एनडीएमधील मित्र पक्ष एकत्र येणार आहेत . पाटणा येथील ज्ञान भवनात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये एनडीएमधील घटक पक्षांचे नेते संबोधित करणार आहेत. मात्र उपेंद्र कुशवाहा यांची अनुपस्थिती या बैकठीमध्ये प्रकर्षाने जाणवणार आहे. तसेच जनता दल युनायटेडचे नेते श्याम रजक यांनी जेडीयू राज्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात पक्षाला 25 जागा मिळाल्याच पाहिजेत, असा आग्रह धरला आहे. जर एनडीएला नीतिश कुमार यांच्या नेतृत्वाचा लाभ हवा असेल तर त्यांना जेडीयूसोबत न्याय करावा लागेल, असा आग्रह रजक यांना धरला आहे.   पोटनिवडणुकांमध्ये सातत्याने होत असलेल्या पराभवांच्या पार्श्वभूमीवर पराभवाचे कारण जाणून घेण्यासाठी एनडीएची बैठक झाली पाहिजे आणि भाजपाने राज्यातील मित्रपक्षांसोबत बैठक घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केली पाहिजे., असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकसमाज पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी दिला होता. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून, लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत भाजपा, लोकजनशक्ती पार्टी आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र आता संयुक्त जनता दलही एनडीएमध्ये सहभागी झाल्याने बिहारमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बिहारमधील एनडीच्या घटक पक्षांकडून जागावाटपाचा आराखडा तयार करण्यासाठी भाजपावर दबाव आणण्यात येत आहे.   

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाBiharबिहार