शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

 बिहारमध्ये एनडीए फुटीच्या उंबरठ्यावर? उपेंद्र कुशवाहा भाजपावर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 15:50 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपाध्यक्ष अमित शाह एनडीएमधील मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतानाचा बिहारमध्ये एनडीएमधील ऐक्याला तडे जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

नवी दिल्ली  - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपाध्यक्ष अमित शाह एनडीएमधील मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतानाचा बिहारमध्ये एनडीएमधील ऐक्याला तडे जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. गुरुवारी संध्याकाळी पाटणा येथे एनडीएमधील मित्रपक्षांसाठी मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या मेजवानीस केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा हे अनुपस्थित राहणार आहेत. तर संयुक्त जनता दलाकडूनही जागावाटपामध्ये 25 जागांसाठी आग्रह होत असल्याने राज्यात एनडीए फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

सुमारे आठ वर्षांनंतप बिहारमध्ये एनडीएमधील मित्र पक्ष एकत्र येणार आहेत . पाटणा येथील ज्ञान भवनात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये एनडीएमधील घटक पक्षांचे नेते संबोधित करणार आहेत. मात्र उपेंद्र कुशवाहा यांची अनुपस्थिती या बैकठीमध्ये प्रकर्षाने जाणवणार आहे. तसेच जनता दल युनायटेडचे नेते श्याम रजक यांनी जेडीयू राज्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात पक्षाला 25 जागा मिळाल्याच पाहिजेत, असा आग्रह धरला आहे. जर एनडीएला नीतिश कुमार यांच्या नेतृत्वाचा लाभ हवा असेल तर त्यांना जेडीयूसोबत न्याय करावा लागेल, असा आग्रह रजक यांना धरला आहे.   पोटनिवडणुकांमध्ये सातत्याने होत असलेल्या पराभवांच्या पार्श्वभूमीवर पराभवाचे कारण जाणून घेण्यासाठी एनडीएची बैठक झाली पाहिजे आणि भाजपाने राज्यातील मित्रपक्षांसोबत बैठक घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केली पाहिजे., असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकसमाज पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी दिला होता. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून, लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत भाजपा, लोकजनशक्ती पार्टी आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र आता संयुक्त जनता दलही एनडीएमध्ये सहभागी झाल्याने बिहारमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बिहारमधील एनडीच्या घटक पक्षांकडून जागावाटपाचा आराखडा तयार करण्यासाठी भाजपावर दबाव आणण्यात येत आहे.   

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाBiharबिहार