शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एनडीए ३८ Vs इंडिया २६; पंतप्रधान मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंचा नामोल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 05:27 IST

‘एनडीए हे प्रादेशिक अस्मितांचे इंद्रधनुष्य’

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. ही लढाई जिंकण्यासाठी भाजपप्रणीत एनडीएने मंगळवारी दिल्लीत ३८ घटक पक्षांची बैठक घेत शक्तिप्रदर्शन केले, तर बंगळुरू येथे आयोजित केलेल्या बैठकीत भाजपला कसे पराभूत करावयाचे यावर २६ विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी विचारमंथन केले. विरोधकांनी आपल्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे. त्यामुळे येणारा मतसंग्राम ‘एनडीए’ विरोधात ‘इंडिया’ असा होणार हे स्पष्ट झाले आहे.

आघाडी बळजबरीने नव्हे तर परस्पर सहकार्याने : पंतप्रधान

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : एनडीएची स्थापना बळजबरीने नव्हे तर परस्परांच्या सहकार्याने व योगदानाने झाली आहे,  असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला लगावला. एनडीए साकारण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रकाशसिंग बादल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अजित सिंह, शरद यादव यासारख्या नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली, असे मोदी यांनी सांगितले.

२०२४च्या लोकसभेसाठी २६ विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचा मुकाबला करण्याकरिता भाजपप्रणित एनडीएने ३८ पक्षांची आघाडी केली. तसेच एनडीएची दिल्लीत मंगळवारी बैठक आयोजित करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतामध्ये विविध राजकीय पक्षांच्या आघाड्या होण्याची परंपरा आहे. मात्र जे केवळ नकारात्मकता पसरवितात अशा प्रवृत्ती कधीही यशस्वी होऊ शकलेल्या नाहीत. 

‘आम्ही टीका करण्यासाठी परकीयांची मदत घेतली नाही’एनडीएने नेहमी सकारात्मक राजकारणाची कास धरली आहे. आम्ही विरोधी बाकांवर होतो तेव्हाही याच धोरणाने वाटचाल केली आहे. आम्ही कधीही परकीय सत्तांची मदत घेतली नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला. राहुल गांधी यांनी अमेरिका, ब्रिटनच्या दौऱ्यांमध्ये केलेली वक्तव्य देशहितविरोधी असल्याची टीका भाजपने केली होती. त्या अनुषंगाने मोदी यांनी देखील एनडीएच्या बैठकीत राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

‘एनडीए हे प्रादेशिक अस्मितांचे इंद्रधनुष्य’

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रादेशिक अस्मितांचे एनडीए हे एक सुंदर इंद्रधनुष्य आहे. या अस्मिता जपण्याचा एनडीएने नेहमी प्रयत्न केला आहे. आम्ही कोणत्याही पक्षाला विरोध करण्यासाठी नव्हे तर देशात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी एनडीएची स्थापना केली. देशाची सुरक्षा, प्रगती, लोकांचे सबलीकरण ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून एनडीए काम करत आहे. सामाजिक न्याय मिळविण्यासाठी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया यांनी आखून दिलेल्या मार्गावर एनडीएची वाटचाल सुरू आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक