शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

NCP vs BJP: "मोदी सरकार देशात आल्यानंतर बेरोजगारांचा वाईट काळ सुरू झाला"; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 19:45 IST

मोदी सरकारच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्या वाढल्याचाही केला दावा

NCP vs BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखालील सरकार हे भांडवलदारांचे आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत आहोत. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या वाढत्या आत्महत्येवरुन तर आता हे स्पष्ट झाले आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार देशात आल्यानंतर देशात रोजंदारी करणार्‍या व बेरोजगारांसाठी वाईट काळ सुरू झाला, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. काल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक सर्वे प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये भारतात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे, असा दावा करण्यात आल्याचे महेश तपासे म्हणाले. त्याचाच आधार घेत तपासे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०१४ साली देशात सरकार आले. तेव्हापासून मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत होतो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या सर्वेनुसार रोजंदारी करणार्‍या लोकांच्या आत्महत्येचे प्रमाण सध्या जास्त आहे. हे प्रमाण आता वाढत जात आहे. याचाच अर्थ देशातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने काहीच केले नाही", असा आरोपही महेश तपासे यांनी केला.

"नोटाबंदी करुन सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेच. पण याशिवाय कोरोना काळात अचानक केलेले लॉकडाऊन यामध्ये अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आणि नोकर्‍यांना मुकावे लागले. मात्र त्यांना दिलासा देण्याऐवजी मोठ्या भांडवलदारांची कर्जे माफ करून मोदी सरकार भांडवलदारांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले", असा थेट आरोप तपासे यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा