शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

NCP vs BJP: "मोदी सरकार देशात आल्यानंतर बेरोजगारांचा वाईट काळ सुरू झाला"; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 19:45 IST

मोदी सरकारच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्या वाढल्याचाही केला दावा

NCP vs BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखालील सरकार हे भांडवलदारांचे आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत आहोत. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या वाढत्या आत्महत्येवरुन तर आता हे स्पष्ट झाले आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार देशात आल्यानंतर देशात रोजंदारी करणार्‍या व बेरोजगारांसाठी वाईट काळ सुरू झाला, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. काल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक सर्वे प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये भारतात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे, असा दावा करण्यात आल्याचे महेश तपासे म्हणाले. त्याचाच आधार घेत तपासे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०१४ साली देशात सरकार आले. तेव्हापासून मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत होतो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या सर्वेनुसार रोजंदारी करणार्‍या लोकांच्या आत्महत्येचे प्रमाण सध्या जास्त आहे. हे प्रमाण आता वाढत जात आहे. याचाच अर्थ देशातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने काहीच केले नाही", असा आरोपही महेश तपासे यांनी केला.

"नोटाबंदी करुन सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेच. पण याशिवाय कोरोना काळात अचानक केलेले लॉकडाऊन यामध्ये अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आणि नोकर्‍यांना मुकावे लागले. मात्र त्यांना दिलासा देण्याऐवजी मोठ्या भांडवलदारांची कर्जे माफ करून मोदी सरकार भांडवलदारांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले", असा थेट आरोप तपासे यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा