शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
2
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
3
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
4
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
5
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
6
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
7
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
8
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
9
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
10
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
11
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
12
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
13
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
14
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
15
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
16
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
17
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
18
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
19
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
20
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    

प्रवाशांनो लक्ष द्या! ट्रेनमध्ये सामान चोरीला गेले तर रेल्वेची जबाबदारी; प्रवाशाची बॅग झाली होती चोरी, आता मिळणार ४.७ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:43 IST

Railways : एनसीडीआरसीने रेल्वेला २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

नवी दिल्ली : "यात्रीगण ध्यान दें! अपने सामान की सुरक्षा स्वयं करें।", अशी उद्घोषणा तुम्ही रेल्वेने प्रवास करताना अनेकदा ऐकली असेलच. पण जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि खबरदारी घेतल्यानंतरही तुमचे सामान चोरीला गेले तर त्याची जबाबदारी रेल्वेची आहे. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचा म्हणजेच एनसीडीआरसीने हा निर्णय आहे. दुर्ग येथील एका प्रवाशाची बॅग चोरीला गेली. आयोगाने आता रेल्वेला प्रवाशाला ४.७ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

प्रवाशाने आपल्या सामानाच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतली, परंतु आरक्षित कोचमध्ये 'बाहेरील लोकांचा' प्रवेश रोखण्याची जबाबदारी पार पाडण्यात टीटीई अपयशी ठरले, असे एनसीडीआरसीने आपल्या आदेशात म्हटले आहे. मे २०१७ मध्ये अमरकंटक एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली होती. जेव्हा दिलीप कुमार चतुर्वेदी हे कटनीहून दुर्गला आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते. पहाटे अडीचच्या सुमारास त्यांच्या स्लीपर कोचमधून सामानाची चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. 

रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तूंसह जवळपास साडेनऊ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यांनी रेल्वे पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आणि दुर्ग जिल्हा ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. जिल्हा आयोगाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे जीएम, दुर्ग स्टेशन मास्टर आणि बिलासपूर जीआरपी पोलिस स्टेशन प्रभारी यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र, रेल्वेने राज्य आयोगाकडे दाद मागितली आणि जिल्हा आयोगाच्या आदेशाला आव्हान दिले. 

राज्य आयोगाने जिल्हा आयोगाचा निर्णय रद्द केला. यानंतर प्रवासी दिलीप कुमार चतुर्वेदी यांनी एनसीडीआरसीमध्ये फेरविचार याचिका दाखल केली. ते म्हणाले की, टीटीई आणि रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे 'अनधिकृत व्यक्तींना' आरक्षित कोचमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळाली. त्यांच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, चोरी करण्यात आलेले सामान योग्य प्रकारे साखळदंडाने बांधले होते आणि निष्काळजीपणाच्या बाबतीत कलम १०० चा बचाव करता येत नाही.

तर, रेल्वेने कलम १०० नुसार, जोपर्यंत कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्याने सामान बुक केले नाही आणि रिसिट दिली नाही. तोपर्यंत प्रशासनाला नुकसानीसाठी जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला. मात्र, एनसीडीआरसीने रेल्वेचा युक्तिवाद फेटाळून लावत आरक्षित कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची काळजी घेण्याची जबाबदारी रेल्वेची असल्याचे सांगितले. तसेच, संबंधित चोरीसाठी रेल्वे जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे आणि याचिकाकर्त्याला (प्रवासी) देण्यात आलेल्या सेवेतील कमतरतांमुळे रेल्वे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते, असे सांगत एनसीडीआरसीने रेल्वेला २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे