शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी नक्षलवाद्यांना बळजबरीनं करावी लागते नसबंदी; कारण ऐकून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 08:25 IST

युवक हिंसा सोडून शस्त्र हातातून फेकत आहेत त्याचं समाधान आहे. आत्मसर्मपण केलेल्या नक्षलवाद्याच्या पुर्नवसनाची जबाबदारी सरकारची आहे असं अमित शाह यांनी सांगितले. 

जगदलपूर - छत्तीसगडच्या जगदलपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला आलेल्या आत्मसर्मपण केलेल्या नक्षलवाद्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. जर एखादा नक्षलवाद्याला लग्न करायचं असेल तर त्याला आधी नसबंदी करावी लागते. माओवादी चळवळीत नसबंदी खूप सामान्य आहे. लग्नासाठी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पार पाडावी लागते असं विधान या नक्षलवाद्याने केले आहे.

तेलंगणात एका नक्षलवाद्याची लग्नाआधी नसबंदी केली होती. अनेक वर्षांनी जेव्हा त्याने सरेंडर केले तेव्हा नसबंदी प्रक्रिया पूर्वीसारखी करण्यासाठी आणखी एक सर्जरी करावी लागली. त्यानंतर तो एका मुलाचा बाप बनला. बहुतांश नक्षली सरेंडर केल्यानंतर पुन्हा कौटुंबिक जीवन जगण्यासाठी ही प्रक्रिया पार पाडतात. रविवारी अमित शाह यांच्यासमोर नक्षलीने हा खुलासा केला. तो म्हणाला की, जेव्हा मी सीपीआय (माओवादी) चा सदस्य होतो तेव्हा मला लग्नाआधी नसबंदी करावी लागली. परंतु जेव्हा सरेंडर करून मुख्य प्रवाहात परतलो तेव्हा मी आणखी एक ऑपरेशन वडील होण्यासाठी केले. दुसऱ्या ऑपरेशननंतर मी एका मुलाचा वडील झालो. नक्षली चळवळीतील नेत्यांना वाटतं की, मुले जन्माला आल्यानंतर त्यांचे सदस्य संसाराच्या मोहात अडकतील असं त्याने सांगितले.

त्याशिवाय या कौटुंबिक भावनेने नक्षलवादी आंदोलनाचं नुकसान होऊ शकतं. लग्न करणारे या आंदोलनापासून दूर होऊ शकतात. त्यामुळेच लग्नाआधी नक्षलवाद्याची नसबंदी केली जाते. नक्षली नेते कुठलाही सदस्य कौटुंबिक बंधनात अडकू नये यासाठी हे पाऊल उचलतात असं  छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील आत्मसर्मपण केलेल्या एका नक्षलवाद्याने म्हटलं. हीच कहाणी ओडिशातील मलकानगिरी इथल्या माजी नक्षलवाद्याची आहे. त्याला महिला नक्षलवाद्याशी लग्न करण्यापूर्वी स्वत:ची नसबंदी करावी लागली असं समोर आले.

दरम्यान, युवक हिंसा सोडून शस्त्र हातातून फेकत आहेत त्याचं समाधान आहे. आत्मसर्मपण केलेल्या नक्षलवाद्याच्या पुर्नवसनाची जबाबदारी सरकारची आहे. नक्षलवादी चळवळीतील लोकांना माझं आवाहन आहे. तुम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहात या. आम्ही तुमची जबाबदारी घेऊ असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीAmit Shahअमित शाह