शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांनी मोबाइल टॉवर आणि पंचायतीची इमारत उडवली, काही जणांचे अपहरण केल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 08:45 IST

घटना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील नक्षलग्रस्त मदनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

पटणा:बिहारच्याऔरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी एक मोबाईल टॉवर उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत पंचायत इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सीआरपीएफची टीम आणि मदनपूर पोलिस घटनास्थळी रवाना झाले असून परिसरात घेराव घातला आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

घटना मदनपूरच्या जुदाही भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील अत्यंत नक्षलग्रस्त मदनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुडाही येथे आलेल्या सुमारे डझनभर नक्षलवाद्यांनी मोबाईल टॉवर उडवला. यानंतर आयईडी फोडून पंचायत भवनाचेही मोठे नुकसान केले. याशिवाय नक्षलवाद्यांनी काही लोकांना पकडून जंगलाच्या दिशेने नेल्याचेही बोलले जात आहे.

अपहरण झाल्याची पुष्टी नाहीः एसपी

औरंगाबादचे एसपी कांतेशकुमार मिश्रा यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी मोबाईल टॉवर उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाचे एक पथक पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण, काही लोकांचे अपहरण केल्याची पुष्टी अध्याप करता येणार नाही. याची माहिती सध्या घेतली जात आहे, संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर स्पष्टपणे यावर बोलता येईल.

सीपीआय-माओवाद्यांकडून बंदची हाक 

नक्षलवादी संघटना CPI-Maoist ने 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये बंद पुकारला आहे. आपला सहकारी माओवादी नेता प्रशांत घोष उर्फ ​​किशन दा आणि त्याची पत्नी शीला मरांडी यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांनी बंद पुकारला आहे. चार दिवसांच्या कालावधीत नक्षलवाद्यांकडून दुसऱ्यांदा बंद पुकारण्यात आला आहे. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदबाबत बिहार-झारखंडचे पोलिस सर्व महामार्गांवर सतत गस्त घालत आहेत. याशिवाय संवेदनशील भागात अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीBiharबिहारAurangabadऔरंगाबाद