शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 09:29 IST

गेल्या ६० वर्षांत नक्षलवादी हल्ल्यांमुळे ४,००० हून अधिक नागरिक आणि २,५०० हून अधिक सुरक्षा जवान मारले गेले आहेत.

नवी दिल्ली - मागील काही काळापासून नक्षलवादी चळवळीविरोधात आक्रमकपणे कारवाई केली जात आहे. नक्षलवाद्यांविरोधात निमलष्करी दलांचे ऑपरेशन सुरूच आहे. देश ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यातूनच नक्षलविरोधी अभियानात अनेक टॉप कमांडर मारले गेलेत. त्यानंतर आता नक्षलवादी संघटनांकडून शांततेचा प्रस्ताव ठेवत १ महिन्याच्या शस्त्रसंधीची मागणी करण्यात आली होती. आज या सशस्त्र संघर्ष विरामाला एक महिना पूर्ण होत आहे.

नक्षली संघटनांच्या शस्त्रसंधीच्या मागणीनंतरही केंद्रीय सुरक्षा जवानांकडून अभियान सुरूच होते. नक्षलवाद्यांनी संघर्ष विरामासाठी १५ ऑगस्टला पत्र लिहिले होते. जे १६ सप्टेंबरला पुढे आले आहे. या पत्रात नक्षल संघटनांनी सशस्त्र संघर्ष १ महिन्यापर्यंत रोखण्याचा आणि सरकारसोबत शांतता चर्चा करण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. नक्षलवादी संघटनांनी मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे १ महिन्याचा संघर्ष विराम करण्याची मागणी करत आवाहन केले होते. या १ महिन्याच्या कालावधीत नक्षली कार्यकर्त्यांसोबत विचार विनिमय करण्यासाठी वेळ मागितला होता. कॉम्रेड अभय नावाने हे पत्र जारी केले होते. जे संघटनेचे महासचिव असल्याचं म्हटलं जाते. आम्ही शांततेच्या दिशेने पाऊल उचलत आहोत, सरकारनेही हिंसेला थांबवावे अशी मागणी पत्रात करण्यात आली होती. 

माहितीनुसार, नक्षलवाद्यांकडून हे पत्र १५ ऑगस्टला जारी केले होते. त्याला आता १ महिना पूर्ण झाला आहे. सशस्त्र संघर्ष विरामाचा कालावधीही संपला आहे. परंतु अद्याप केंद्र सरकारकडून या पत्राला कुठलेही उत्तर दिले नाही. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत भारताला नक्षलमुक्त करण्याचं ठरवलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत अनेकदा मार्च २०२६ ची डेडलाइन दिली आहे. जानेवारी २०२४ मध्ये सुरक्षा जवानांनी नक्षलवादीविरोधी अभियानाला गती दिली. केंद्रीय निमलष्करी दल आणि नक्षली संघटनांमध्ये झालेल्या चकमकीत अनेक टॉप कमांडर आतापर्यंत मारले गेले आहेत. 

गेल्या ६० वर्षांत नक्षलवादी हल्ल्यांमुळे ४,००० हून अधिक नागरिक आणि २,५०० हून अधिक सुरक्षा जवान मारले गेले आहेत. छत्तीसगढ, झारखंड, बिहार आणि ओडिशासारख्या राज्यांमध्ये ही हिंसा सतत सुरू आहे. नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक आदिवासी आणि सरकारी कर्मचारी बळी पडले आहेत. नक्षलवाद्यांना हिंसा सोडून शरण यावे आणि मुख्य प्रवाहात सामील होावेत. अन्यथा, नक्षलवादांना अंतिम धक्का देऊ असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला होता. शांततेसाठी प्रयत्न सुरू आहेत, पण हिंसा चालू राहिल्यास कठोर कारवाई होईल असंही शाह यांनी म्हटलं होते. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादी