शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

नक्षलींचा 'डोंगर' सुरक्षा दलांच्या ताब्यात; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:39 IST

देशातील सर्वात मोठी मोहीम ठरली यशस्वी

नवी दिल्ली : छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवरील सुमारे ५,००० फूट उंच असलेल्या आणि नक्षलवाद्यांचा मुख्य तळ मानल्या गेलेल्या कर्रेपट्टा डोंगरावर अखेर सुरक्षादलांनी पुन्हा ताबा मिळवला आहे. नऊ दिवस चाललेल्या कठोर लढ्यानंतर, सुरक्षादलांनी हा प्रदेश पुन्हा ताब्यात घेत तिरंगा फडकवला.

हा भाग नक्षल नेता हिडमा, देवा, दामोदर, आझाद आणि सुजाता यांचा गड मानला जात असे. परंतु आता या भागावर पूर्णपणे सुरक्षादलांचे नियंत्रण आहे. हे अभियान छत्तीसगडमधील बस्तर परिसरात आजवरचे सर्वात मोठे नक्षलविरोधी अभियान मानले जात आहे.

'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन

या मोहिमेत जिल्हा राखीव दल, बस्तर फायटर्स, विशेष कार्यदल, राज्य पोलीस दलाच्या सर्व युनिट्स, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि त्यांचे विशेष कमांडो ‘कोब्रा’ यांनी सहभाग घेतला होता. सुमारे २४,००० सुरक्षा कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते.

कर्रेपट्टा आणि दुर्गमगट्टा या डोंगरांच्या घनदाट जंगलात ८०० चौरस किलोमीटरच्या परिसरात २१ एप्रिलपासून हे अभियान सुरू झाले. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने, सुरक्षादलांनी उंचसखल भागात प्रवेश करत नक्षलवाद्यांना हुसकावून लावले.

केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक जी.पी. सिंग यांनीही बुधवारी मोहिमेच्या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला.

हा डोंगर पूर्वी माओवादी ‘जनमुक्ती गुरिल्ला लष्कर’ (पीएलजीए) च्या बटालियन क्रमांक १ चा मुख्य तळ होता. हे नक्षलवादी या भागातील आदिवासींवर दबाव टाकून सुरक्षित आसरा घेत असत. आता मात्र सुरक्षादलांनी तो संपूर्ण भाग नक्षलांपासून मुक्त केला आहे.

 पीएलजए, तेलंगणा राज्य समिती, दंडकारण्य विशेष झोनल समिती आणि मध्यवर्ती प्रादेशिक समिती या नक्षली संघटनांच्या यांच्या हालचाली पूर्णपणे बंद पाडणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या ठिकाणी जवळपास ५०० नक्षलवादी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंबंधी ठोस कार्ययोजना आखली आहे.

छत्तीसगड सरकारने स्पष्ट केले आहे की, हिंसक मार्ग स्वीकारणाऱ्यांशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही. आत्मसमर्पण करणाऱ्यांना शासनाच्या धोरणानुसार मदत आणि पुनर्वसन दिले जाईल, परंतु हिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

२०२४ मध्ये आतापर्यंत १४४ नक्षलवादी चकमकीत ठार मारण्यात आले असून त्यातील १२८ हे बस्तर विभागातील आहेत. मार्च २९ रोजी झालेल्या दोन मोठ्या चकमकांमध्ये १८ नक्षलवादी ठार झाले होते, ज्यात ११ महिला होत्या.

याच कालावधीत सुमारे

३०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांना प्रत्येकी ५०,०००

रुपये आर्थिक मदत आणि पुनर्वसन सुविधा दिल्या गेल्या आहेत. २०२४

मध्ये एकूण ७९२ नक्षलवाद्यांनी

केवळ बस्तर भागात आत्मसमर्पण केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी