शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पुढच्या 3-4 वर्षांत नक्षलवाद्यांचा बीमोड करू - राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 11:13 IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढच्या 3-4 वर्षांत देशातील नक्षलवाद्यांचा बीमोड करू असं म्हटलं आहे. झारखंडमधील चतरामध्ये मंगळवारी (23 एप्रिल) एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी नक्षलवादावर भाष्य केले आहे.

ठळक मुद्दे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढच्या 3-4 वर्षांत देशातील नक्षलवाद्यांचा बीमोड करू असं म्हटलं आहे.झारखंडमधील चतरामध्ये मंगळवारी (23 एप्रिल) एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी नक्षलवादावर भाष्य केले आहे. 'देशाच्या 126 जिल्ह्यांमध्ये पसरलेला नक्षलवाद आता केवळ फक्त 7-8 जिल्ह्यांपर्यंतच मर्यादित राहीला आहे.'

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढच्या 3-4 वर्षांत देशातील नक्षलवाद्यांचा बीमोड करू असं म्हटलं आहे. झारखंडमधील चतरामध्ये मंगळवारी (23 एप्रिल) एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी नक्षलवादावर भाष्य केले आहे. 

'देशाच्या 126 जिल्ह्यांमध्ये पसरलेला नक्षलवाद आता केवळ फक्त 7-8 जिल्ह्यांपर्यंतच मर्यादित राहीला आहे. पुढच्या 3-4 वर्षांत भारतातून नक्षलवाद्यांचा बीमोड करू असे आश्वासन मी तुम्हाला देतो' असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तसेच सुरक्षा हा देशाच्या विकासामधील आवश्यक भाग आहे आणि त्याच्या मार्गात येणारे दहशतवादी यांना चिरडून टाकण्यात येईल, असं राजनाथ यांनी एका सभेत सांगितलं आहे.

झारखंडमधील नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आला आहे, राज्यात काही ठिकाणी असलेले त्यांचे अस्तित्व लवकरच संपुष्टात आणले जाईल. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसने सत्तेसाठी हातमिळवणी केली आहे, मात्र त्यांचे उद्दिष्ट सफल होणार नाही असेही गृहमंत्री म्हणाले आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी 'मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे असते शूरवीरांचे नाही' असे म्हटले होते. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी केली होती. तसेच यावरून राजकारण करू पाहणाऱ्यांना मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे असते शूरवीरांचे नाही असा टोला राजनाथ सिंह यांनी लगावला होता. 

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये सोमवारी (1 एप्रिल) एका प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राजनाथ सिंह या रॅलीमध्ये  सहभागी झाले असून यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 1971 ला स्व. इंदिरा गांधी यांचे सरकार असताना भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती, तेव्हा अटल बिहारी वायपेयी यांनी संसदेमध्ये उभे राहून त्यांची प्रशंसा केली होती. त्यावेळी पाकिस्तानला धूळ चारल्यामुळे इंदिरा गांधींचा जयजयकार होत असेल तर आता पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवणाऱ्या पंतप्रधान मोदींची प्रशंसा का होत नाही? मोदींची प्रशंसा करण्याऐवजी काँग्रेसला एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी ठार झाले हे जाणून घेण्यात रस आहे. परंतु शूरवीर मृतदेह मोजत बसतात का? मृतदेह मोजण्याचे काम वीरांचे नाही तर गिधाडांचे असल्याचा टोला राजनाथ सिंह यांनी लगावला होता.

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहnaxaliteनक्षलवादीIndiaभारत