शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Naxal Attack: छत्तीसगड नक्षलवादी हल्ले; गेल्या काही वर्षात सूमारे 200 जवानांना वीरमरण तर 25 नेत्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 17:49 IST

Major Naxal Attacks in Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये झालेल्या हल्ल्यात जवानांसह राजकीय नेते आणि शेकडो सामान्य लोकांचाही मृत्यू झाला आहे.

Naxal Attacks in Chhattisgarh: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे आज(दि.26) नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. दंतेवाडाच्या अरणपूरमध्ये जिल्हा रिजर्व्ह गार्ड (DRG) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर आयईडी हल्ला करण्यात आला. या स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नक्षलवाद्यांविरुद्धचा लढा शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू राहील, असे म्हटले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी सांगितले की, नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर डीआरजी जवानांना घटनास्थळी पाठवण्यात आले. शोध मोहिमेनंतर ते परतत असताना आयईडीचा स्फोट झाला. यामध्ये 10 डीआरजी जवान आणि एका ड्रायव्हरला आपला जीव गमवावा लागला. हल्ल्यानंतर घटनास्थळी अधिक फौजफाटा पाठवण्यात आला आहे.

याआधीही छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ले झाले

  • एप्रिल 2021 मध्ये विजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 22 जवानांना प्राण गमवावे लागले होते.
  • मार्च 2018 मध्ये सुकमा जिल्ह्यात IED स्फोटात 9 CRPF जवान शहीद झाले होते.
  • एप्रिल 2017 मध्ये सुकमा येथे माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत 24 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. याच्या महिनाभरापूर्वी सुकमामध्येच आणखी 12 सीआरपीएफ जवानांना प्राण गमवावे लागले होते.
  • त्याआधी मार्च 2014 मध्ये सुकमामध्येच 15 सुरक्षा जवान शहीद झाले होते.
  • मे 2013 मध्ये काँग्रेस नेत्यांवर मोठा हल्ला झाला होता. यामध्ये 25 नेते मारले गेले, त्यात मंत्री महेंद्र कर्मा यांचाही समावेश आहे. बस्तरच्या दरभा खोऱ्यात हा हल्ला झाला होता.
  • जून 2010 मध्ये नक्षलवाद्यांनी नारायणपूरवर हल्ला केला, ज्यात 26 CRPF जवान शहीद झाले.
  • एप्रिल 2010 मध्येच दंतेवाडा येथे 75 जवान शहीद झाले होते.

सुरक्षा कर्मचार्‍यांव्यतिरिक्त लोकांनाही लक्ष्य करण्याची संधी नक्षलवाद्यांनी सोडली नाही. फेब्रुवारी 2006 मध्ये छत्तीसगडमधील एराबोरू गावात नक्षलवाद्यांनी त्यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांवर भूसुरुंगांचा वापर करून हल्ला केला. यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला होता. जुलै 2006 मध्ये दंतेवाडा येथील मदत शिबिरावर हल्ला झाला होता. अनेक गावकऱ्यांचे अपहरण केले. यामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादीTerror Attackदहशतवादी हल्ला