शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

Naxal Attack: छत्तीसगड नक्षलवादी हल्ले; गेल्या काही वर्षात सूमारे 200 जवानांना वीरमरण तर 25 नेत्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 17:49 IST

Major Naxal Attacks in Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये झालेल्या हल्ल्यात जवानांसह राजकीय नेते आणि शेकडो सामान्य लोकांचाही मृत्यू झाला आहे.

Naxal Attacks in Chhattisgarh: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे आज(दि.26) नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. दंतेवाडाच्या अरणपूरमध्ये जिल्हा रिजर्व्ह गार्ड (DRG) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर आयईडी हल्ला करण्यात आला. या स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नक्षलवाद्यांविरुद्धचा लढा शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू राहील, असे म्हटले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी सांगितले की, नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर डीआरजी जवानांना घटनास्थळी पाठवण्यात आले. शोध मोहिमेनंतर ते परतत असताना आयईडीचा स्फोट झाला. यामध्ये 10 डीआरजी जवान आणि एका ड्रायव्हरला आपला जीव गमवावा लागला. हल्ल्यानंतर घटनास्थळी अधिक फौजफाटा पाठवण्यात आला आहे.

याआधीही छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ले झाले

  • एप्रिल 2021 मध्ये विजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 22 जवानांना प्राण गमवावे लागले होते.
  • मार्च 2018 मध्ये सुकमा जिल्ह्यात IED स्फोटात 9 CRPF जवान शहीद झाले होते.
  • एप्रिल 2017 मध्ये सुकमा येथे माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत 24 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. याच्या महिनाभरापूर्वी सुकमामध्येच आणखी 12 सीआरपीएफ जवानांना प्राण गमवावे लागले होते.
  • त्याआधी मार्च 2014 मध्ये सुकमामध्येच 15 सुरक्षा जवान शहीद झाले होते.
  • मे 2013 मध्ये काँग्रेस नेत्यांवर मोठा हल्ला झाला होता. यामध्ये 25 नेते मारले गेले, त्यात मंत्री महेंद्र कर्मा यांचाही समावेश आहे. बस्तरच्या दरभा खोऱ्यात हा हल्ला झाला होता.
  • जून 2010 मध्ये नक्षलवाद्यांनी नारायणपूरवर हल्ला केला, ज्यात 26 CRPF जवान शहीद झाले.
  • एप्रिल 2010 मध्येच दंतेवाडा येथे 75 जवान शहीद झाले होते.

सुरक्षा कर्मचार्‍यांव्यतिरिक्त लोकांनाही लक्ष्य करण्याची संधी नक्षलवाद्यांनी सोडली नाही. फेब्रुवारी 2006 मध्ये छत्तीसगडमधील एराबोरू गावात नक्षलवाद्यांनी त्यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांवर भूसुरुंगांचा वापर करून हल्ला केला. यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला होता. जुलै 2006 मध्ये दंतेवाडा येथील मदत शिबिरावर हल्ला झाला होता. अनेक गावकऱ्यांचे अपहरण केले. यामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादीTerror Attackदहशतवादी हल्ला