शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

"मोदी गंगा स्वच्छतेच्या आश्वासनानं सत्तेत आले, राफेलनं पायउतार होतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 11:54 IST

काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्लीः काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2014मध्ये गंगा स्वच्छ करण्याचं आश्वासन देऊन मोदी सत्तेत आले, परंतु 2019ला राफेलमधील घोटाळ्यामुळे त्यांना सत्तेबाहेर जावं लागणार आहे. गंगा स्वच्छतेवरून सिद्धू यांनी मोदींवर प्रहार केला आहे. मोदींनी केलेला गंगा स्वच्छतेचा दावा फार खोटा ठरला आहे, गंगा आमची ओळख आहे. ओळखच हरवली तर कुठे जाणार, असा प्रश्नही सिद्धू यांनी उपस्थित केला आहे.डिजिटल इंडियाअंतर्गत ब्रॉड बँड कनेक्टिव्हिटी अडीच लाख गावांत जाणार होती, पण फक्त 1 लाख 10 हजार गावांपर्यंत फक्त केबल पोहोचली आहे, मोदींनी ग्रामपंचायतीपर्यंत इंटरनेट घेऊन जाणार असल्याची दिलेली मोठंमोठी आश्वासन फोल ठरली आहेत. मोदींनी अद्यापही जालियनवाला बाग स्मारक ट्रस्टची बैठक घेतली नाही. तसेच अमृतसरला भेट दिलेली नाही, असंही सिद्धू म्हणाले आहेत.

मोदींकडे प्रचारासाठी आता कोणतेच विकासाचे मुद्दे नाहीत, म्हणूनच ते जनतेची दिशाभूल करत आहेत. 2014मध्ये मोदींनी सांगितलं, ना खाऊंगा, ना खाने दुंगा, परंतु सर्वच त्या उलट केलं. मोदींनी 2014मध्ये 300हून अधिक आश्वासनं दिली होती. ज्यात गंगा नदीची स्वच्छता, दरवर्षी दोन कोटी रोजगार उत्पन्न करणं, प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करणे यांसारख्या आश्वासनांचा समावेश होता. परंतु यातलं एकही आश्वासन सत्यात उतरलं नाही, अशी टीकाही सिद्धू यांनी मोदींवर केली आहे.   

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू