शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

'शेतकरी वर्षभर आंदोलन करत होते, पंतप्रधान फक्त 15 मिनिटांत अस्वस्थ झाले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 17:24 IST

Navjot Singh Sidhu: पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, “शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एका वर्षाहून अधिक काळ धरणे धरून बसले होते, परंतु काल जेव्हा पंतप्रधानांना सुमारे 15 मिनिटे थांबावे लागले तेव्हा ते अस्वस्थ झाले.

चंदीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर रॅली रद्द झाल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची चर्चा आहे. भटिंडा विमानतळावरgन रस्त्याने फिरोजपूरला जात असताना शेतकऱ्यांची निदर्शने सुरू होती. त्यामुळे पीएम मोदींचा ताफा 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून पडला होता. यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परतला. या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी शेतकरी आंदोलनावरुन नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एका वर्षाहून अधिक काळ आंदोलन केल. त्यांच्याबद्दल कुणी विचारणा केली नाही, पण काल ​​जेव्हा पंतप्रधानांना फक्त 15 मिनिटे थांबावे लागले तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे, हा दुटप्पीपणा का? असा सवाल सिद्धूंनी केला. तसेच, मोदीजी, तुम्ही शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगितले होते, पण त्यांच्याकडे जे होते तेही तुम्ही काढून घेतले, अशी टीकाही केली.

'जिवंत आलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा'उड्डाणपुलावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे बुधवारी पंतप्रधानांचा ताफा रॅलीच्या ठिकाणी पोहचू शकला नाही. यानंतर पंतप्रधानांनी आपली सभा रद्द करुन भटिंडा विमानतळावर परतले. भटिंडा विमानतळावर परत येताना मोदी तिथल्या अधिकाऱ्यांना म्हणाले, "भटिंडा विमानतळापर्यंत मी जिवंत परत येऊ शकलो याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांचे आभार." दरम्यान, या घटनेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने या घटनेला पंतप्रधानांच्या सुरक्षेतील 'गंभीर त्रुटी' असल्याचे म्हटले आहे. 

गृहमंत्रालयाने अहवाल मागवला

गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याने पंजाबच्या दौऱ्यादरम्यान गंभीर सुरक्षा उल्लंघनानंतर परतण्याचा निर्णय घेतला. निवेदनात मंत्रालयाने पंजाब सरकारला या त्रुटीची जबाबदारी निश्चित करण्यास आणि कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान भटिंडाहून हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जात असताना ही घटना घडली.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूNarendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब