शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! फळ विक्रेत्याच्या मुलाची कमाल; Naturals Ice Cream च्या माध्यमातून तब्बल 300 कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 12:14 IST

Naturals Ice Cream : एका फळविक्रेत्याच्या मुलाने फळांपासून आईस्क्रिम तयार केलं आणि ते देशभरात आता प्रचंड लोकप्रिय झालं आहे. तब्बल 300 कोटींचा व्यवसाय सध्या उभा केला आहे.

नवी दिल्ली - आईस्क्रिम हे सर्वांच्याच आवडीचं. स्टॉबेरी, व्हॅनिला, मँगो, च़ॉकलेटसारखे फ्लेव्हर्स पाहिल्यावर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. फळांपासून तयार केलेलं आईस्क्रिम तर सर्वात बेस्ट असतं. एका फळविक्रेत्याच्या मुलाने फळांपासून आईस्क्रिम तयार केलं आणि ते देशभरात आता प्रचंड लोकप्रिय झालं आहे. तब्बल 300 कोटींचा व्यवसाय सध्या उभा केला आहे. रघुनंदन एस कामथ यांनी ही कमाल केली आहे. "नॅचरल्स आईस्क्रिम"च्या माध्यमातून त्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अगदी छोट्या स्वरूपात सुरू केलेल्या व्यवसायाची आता कोट्यवधींची उलाढाल आहे. यातून नवीन काहीतरी करू पाहणाऱ्या तरुणांना तसेच व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रेरणा मिळत आहे. 

मुंबईत सुरुवातीला स्वत:चं आईस्क्रिमचं छोटंस एक दुकान चालवणाऱ्या रघुनंदन यांनी "आईस्क्रिम मॅन" म्हणून स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नॅचरल आईस्क्रिम (Natural Icecream) नावाची अत्यंत प्रसिद्ध कंपनी स्वकष्टाने उभी केली आहे. याच देशाच्या कानाकोपऱ्यात या कंपनीचे आईस्क्रिम पार्लर आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल 300 कोटी आहे. आज देशभरात नॅचरल्स आईस्क्रिमचे 135 हून अधिक आउटलेट्स आहेत. ज्यामध्ये 20 हून अधिक फ्लेवर्सचे आईस्क्रिम उपलब्ध आहेत. रघुनंदन यांचा जन्म कर्नाटकातील पुत्तूर तालुक्यातील मुलकी नावाच्या छोट्या गावात झाला. वडील फळांची लागवड करीत असत आणि फळांची विक्री करून कुटुंबाचं पोट भरत असतं. 

The Better India च्या रिपोर्टनुसार, रघुनंदन हे सात भावंडांपैकी सर्वात लहान होते. 1966 मध्ये रघुनंदन आपल्या भावांकडे मुंबईत राहायला आले. तिथे ते इडली-डोसा असा एक फूड स़्टॉल चालवायचे त्यासोबत आईस्क्रिम सुद्धा देत असत. पण तेव्हा आईस्क्रिम हा त्यांच्या व्यवसायाचा एक छोटासा भाग होता. मात्र त्यांना आईस्क्रिममध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करायची होती. 1983 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि नंतर त्यांनी आईस्क्रिम व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. पण त्यावेळी बाजारात अनेक प्रसिद्ध ब्रँड उपलब्ध होते. अशावेळी रघुनंदन यांनी रिस्क घेण्याचा विचार करून फक्त आईस्क्रिमसाठी काम सुरू केलं. 

14 फेब्रुवारी 1984 मध्ये रघुनंदन यांनी मुंबईमध्ये Naturals Ice Cream, Mumbai नावाने पहिलं आऊटलेट सुरू केलं. त्यांनी यासाठी जुहू हे ठिकाण निवडलं कारण तिथे मोठी मोठी मंडळी राहत होती. पण फक्त आईस्क्रिम खाण्यासाठी लोक सुरुवातीला येत नव्हते. त्यामुळे त्यांनी पाव भाजीही विकायला सुरुवात केली. गरम गरम मसालेदार पाव भाजीनंतर लोकांना थंड आणि गोड पदार्थ म्हणून आईस्क्रिम सर्व्ह करत असे. रघुनंदन यांन फळं, दूध आणि साखरेपासून आईस्क्रीम तयार केलं. आंबा, चॉकलेट, सीताफळ आणि स्ट्रॉबेरी असे फ्लेव्हर्स हे सुरुवातीला लॉन्च करण्यात आले.

रघुनंदन यांनी आपलं प्रोडक्ट सुपर स्पेशल करण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत केलं. अनेक सेलिब्रिटी हे त्यांचे ग्राहक होते. ते वेगवेगळ्या देशांमध्ये फिरून आले होते. त्यामुळेच त्यांनी त्यांच्याकडून फीडबॅक आणि सल्ला घेण्यास सुरुवात केली. फळांपासून आईस्क्रिम तयार करणं ही प्रक्रिया सोपी नव्हती. त्यांनी स्वत: फळांवर प्रक्रिया करण्यासाठी खास मशीन्स तयार केली. आपल्या गरजेनुसार डिझाईन आणि तयार केले. मशीनच्या मदतीने काम जलद होऊ लागले. त्यामुळे उत्पादन वाढू लागले आणि त्यामुळे व्यवसायही वाढला. हळूहळू फ्रँचायजीच्या माध्यमातून कंपनीची आउटलेटही वाढू लागली. काही दुकान रघुनंदन कामथ यांच्या देखरेखीखाली सुरू आहेत तर बहुतेक फ्रेंचायजी म्हणून कार्यरत आहेत. देशभरात नॅचरल्स आईस्क्रिमचे 135 हून अधिक आउटलेट्स आहेत.

टॅग्स :IndiaभारतInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी