शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

महापुरामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका! 10,000-15,000 कोटी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 14:04 IST

Natural disasters in India: 1990 पासून अमेरिका आणि चीननंतर भारताने सर्वाधिक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे.

Natural disasters in India: गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये महापूर आला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सारख्या राज्यांमध्ये ओसंडून वाहणाऱ्या नद्यांचा अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. SBIच्या इकोरॅप संशोधन अहवालानुसार, पुरामुळे 10,000-15,000 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

सध्या आलेल्या पुरामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा अंदाज बांधणे अद्याप बाकी आहे, असेही अहवालात म्हटले आहे. रिपोर्टनुसार, एकूण नुकसान 10,000-15,000 कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकते. 1990 पासून अमेरिका आणि चीननंतर भारताने सर्वाधिक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. 2001-2022 पर्यंत भारतात 361 नैसर्गिक आपत्तींची नोंद झाली आहे.

आपत्तींमुळे आर्थिक ताणनैसर्गिक आपत्तींनी आर्थिक नुकसानीचे नवे विक्रम प्रस्थापित केल्याचे अहवालात म्हटले आहे. पूर ही भारतातील सर्वात सामान्य नैसर्गिक आपत्ती आहे. सुमारे 41 टक्के नैसर्गिक आपत्ती या पूर आणि वादळाच्या स्वरुपात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. एसबीआयच्या अहवालात असेही म्हटले आहे की, भारतात सुरक्षेची मोठी तफावत आहे. 2022 मध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे जागतिक स्तरावर $ 275 अब्जच्या एकूण आर्थिक नुकसानीपैकी $ 125 अब्ज विम्याद्वारे कव्हर केले गेले.

विमा क्षेत्राशी निगडीत नैसर्गिक आपत्तीच्या जोखमीसाठी 'आपत्ती पूल'च्या गरजेवर अहवालात भर देण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, 2020 मध्ये भारतातील पुराच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास एकूण आर्थिक नुकसान $ 7.5 अब्ज (52,500 कोटी रुपये) होते. परंतु विमा संरक्षण केवळ 11 टक्के झाले. भारताला नैसर्गिक आपत्तींसाठी 'आउट-ऑफ-द-बॉक्स सोल्युशन्स' आणि सुरक्षेच्या अंतरांबाबत व्यवसायांमध्ये जागरूकता आवश्यक आहे. एमएसएमई क्षेत्रात देशातील फक्त पाच टक्के युनिट्सचा विमा उतरवला जातो. या भागाला अत्यंत उच्च पातळीच्या सुरक्षेची गरज आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारतfloodपूरRainपाऊस