शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महापुरामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका! 10,000-15,000 कोटी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 14:04 IST

Natural disasters in India: 1990 पासून अमेरिका आणि चीननंतर भारताने सर्वाधिक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे.

Natural disasters in India: गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये महापूर आला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सारख्या राज्यांमध्ये ओसंडून वाहणाऱ्या नद्यांचा अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. SBIच्या इकोरॅप संशोधन अहवालानुसार, पुरामुळे 10,000-15,000 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

सध्या आलेल्या पुरामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा अंदाज बांधणे अद्याप बाकी आहे, असेही अहवालात म्हटले आहे. रिपोर्टनुसार, एकूण नुकसान 10,000-15,000 कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकते. 1990 पासून अमेरिका आणि चीननंतर भारताने सर्वाधिक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. 2001-2022 पर्यंत भारतात 361 नैसर्गिक आपत्तींची नोंद झाली आहे.

आपत्तींमुळे आर्थिक ताणनैसर्गिक आपत्तींनी आर्थिक नुकसानीचे नवे विक्रम प्रस्थापित केल्याचे अहवालात म्हटले आहे. पूर ही भारतातील सर्वात सामान्य नैसर्गिक आपत्ती आहे. सुमारे 41 टक्के नैसर्गिक आपत्ती या पूर आणि वादळाच्या स्वरुपात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. एसबीआयच्या अहवालात असेही म्हटले आहे की, भारतात सुरक्षेची मोठी तफावत आहे. 2022 मध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे जागतिक स्तरावर $ 275 अब्जच्या एकूण आर्थिक नुकसानीपैकी $ 125 अब्ज विम्याद्वारे कव्हर केले गेले.

विमा क्षेत्राशी निगडीत नैसर्गिक आपत्तीच्या जोखमीसाठी 'आपत्ती पूल'च्या गरजेवर अहवालात भर देण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, 2020 मध्ये भारतातील पुराच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास एकूण आर्थिक नुकसान $ 7.5 अब्ज (52,500 कोटी रुपये) होते. परंतु विमा संरक्षण केवळ 11 टक्के झाले. भारताला नैसर्गिक आपत्तींसाठी 'आउट-ऑफ-द-बॉक्स सोल्युशन्स' आणि सुरक्षेच्या अंतरांबाबत व्यवसायांमध्ये जागरूकता आवश्यक आहे. एमएसएमई क्षेत्रात देशातील फक्त पाच टक्के युनिट्सचा विमा उतरवला जातो. या भागाला अत्यंत उच्च पातळीच्या सुरक्षेची गरज आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारतfloodपूरRainपाऊस