शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

राष्ट्रीय सुरक्षा हासुद्धा या निवडणुकांमधील महत्त्वाचा मुद्दा - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 06:07 IST

राष्ट्रीय सुरक्षा हाही निवडणुकांतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात पालिगंज येथे प्रचारसभेत ते बोलत होते.

पालीगंज : राष्ट्रीय सुरक्षा हाही निवडणुकांतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात पालिगंज येथे प्रचारसभेत ते बोलत होते.त्यांनी सांगितले की, दहशतवादाला आक्रमक शैलीतच उत्तर देणे योग्य असून तेच धोरण माझ्या सरकारने अंगिकारले आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा निवडणुकांतील मुद्दा होऊ शकत नाही, असे विरोधकांच्या महाभेसळ आघाडीचे मत आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत निरपराध माणसे मरण पावत असताना राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा नाही असे म्हणणे चुकीचे आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसूनच मारले पाहिजे आणि हवाई दलाने त्यामुळेच पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला.राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर पंतप्रधानांनी टीका केली. ते म्हणाले की, काहीजण जातीपातीचे राजकारण करून सत्ता मिळविण्याचा खटाटोप करत आहेत. आपल्याच कुटुंबातील सदस्यांना पुढे आणताना हे नेते स्वत:च्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र डावलत आहेत.काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी १९८४मध्ये दिल्लीमध्ये शीखविरोधी दंगलींबाबत ‘झाले ते झाले' असे उद्गार काढले होते. त्याबद्दलमोदी म्हणाले की, पित्रोदांच्या उद्गारांतून विरोधकांचा उद्धटपणा व क्षमा न मागण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन घडते. (वृत्तसंस्था)

विकासाची गंगा आणूनरेंद्र मोदी यांनी सांगितले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकांतपुन्हा भाजपच जिंकणार आहे. पंतप्रधानपदाच्या पुढच्या कारकीर्दीत मी बिहारमध्ये नव्याने विकासाची गंगा आणेन. लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातही भाजप व त्याच्या मित्रपक्षांनाच भरघोस मतदान करण्याचेआवाहन त्यांनी जनतेला केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक