शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राष्ट्रीय सुरक्षा हासुद्धा या निवडणुकांमधील महत्त्वाचा मुद्दा - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 06:07 IST

राष्ट्रीय सुरक्षा हाही निवडणुकांतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात पालिगंज येथे प्रचारसभेत ते बोलत होते.

पालीगंज : राष्ट्रीय सुरक्षा हाही निवडणुकांतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात पालिगंज येथे प्रचारसभेत ते बोलत होते.त्यांनी सांगितले की, दहशतवादाला आक्रमक शैलीतच उत्तर देणे योग्य असून तेच धोरण माझ्या सरकारने अंगिकारले आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा निवडणुकांतील मुद्दा होऊ शकत नाही, असे विरोधकांच्या महाभेसळ आघाडीचे मत आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत निरपराध माणसे मरण पावत असताना राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा नाही असे म्हणणे चुकीचे आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसूनच मारले पाहिजे आणि हवाई दलाने त्यामुळेच पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला.राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर पंतप्रधानांनी टीका केली. ते म्हणाले की, काहीजण जातीपातीचे राजकारण करून सत्ता मिळविण्याचा खटाटोप करत आहेत. आपल्याच कुटुंबातील सदस्यांना पुढे आणताना हे नेते स्वत:च्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र डावलत आहेत.काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी १९८४मध्ये दिल्लीमध्ये शीखविरोधी दंगलींबाबत ‘झाले ते झाले' असे उद्गार काढले होते. त्याबद्दलमोदी म्हणाले की, पित्रोदांच्या उद्गारांतून विरोधकांचा उद्धटपणा व क्षमा न मागण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन घडते. (वृत्तसंस्था)

विकासाची गंगा आणूनरेंद्र मोदी यांनी सांगितले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकांतपुन्हा भाजपच जिंकणार आहे. पंतप्रधानपदाच्या पुढच्या कारकीर्दीत मी बिहारमध्ये नव्याने विकासाची गंगा आणेन. लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातही भाजप व त्याच्या मित्रपक्षांनाच भरघोस मतदान करण्याचेआवाहन त्यांनी जनतेला केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक