शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
2
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
3
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
4
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
5
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
6
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
7
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप
8
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
9
इलेक्ट्रिक टुव्हीलरनंतर आता थ्री-व्हीलर! 'या' कंपनीने बाजारात उतरवले रिक्षाचे २ मॉडेल्स; किंमत आणि फीचर्स काय?
10
श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट!
11
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
12
थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
13
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
14
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
15
आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा
16
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
17
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
18
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
19
OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 
20
लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 

Coronavirus: प्रवासी मजुरांसाठी कोणत्याही जिल्ह्यांतून श्रमिक एक्सप्रेस चालवण्यास तयार, रेल्वेची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 09:02 IST

जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिका-यांमार्फत कामगारांची यादी व त्यांच्या ठिकाणांच्या तपशिलासह अर्ज करावा लागणार आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.कोणत्याही जिल्ह्यातून रेल्वे विशेष गाड्या चालविण्यास तयार असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांच्या यादीसह राज्य नोडल अधिका-यांमार्फत अर्ज करावा लागणार आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. कोणत्याही जिल्ह्यातून रेल्वे विशेष गाड्या चालविण्यास तयार असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांच्या यादीसह राज्य नोडल अधिका-यांमार्फत अर्ज करावा लागणार आहे. गोयल यांनी एका ट्विट करत म्हटले की, देशातील विविध भागात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे कोणत्याही जिल्ह्यातून श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यास तयार आहे. यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिका-यांमार्फत कामगारांची यादी व त्यांच्या ठिकाणांच्या तपशिलासह अर्ज करावा लागणार आहे.डीएमला नोडल ऑफिसरमार्फत अर्ज करावा लागतोगोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशातील विविध भागात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे कोणत्याही जिल्ह्यातून श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यास तयार आहे. यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिका-यांमार्फत कामगारांची यादी व त्यांच्या ठिकाणांच्या तपशिलासह अर्ज करावा लागेल. रेल्वेमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यांच्या नोडल अधिका-यांची यादीही जोडली आहे.रेल्वे दररोज 300 गाड्या चालवण्यास तयाररेल्वेमंत्री गेल्या काही दिवसांपासून मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्यासाठी राज्य सरकारांच्या संपर्कात आहेत. विशेषतः राजस्थान, झारखंड आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांना त्यांच्याकडे अडकलेल्या प्रवासी मजुरांची माहिती द्यावी अन् नोडल अधिकाऱ्यांमार्फत अडकलेल्या प्रवाशांची नावं द्यावीत, असंही आवाहनही रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. 1 मे ते 15 मेदरम्यानच्या मध्यरात्रीपर्यंत देशभरात 1074 कामगार गाड्या चालविण्यात आल्या आहेत. 15 दिवसांत सुमारे 14 लाख प्रवासी कामगारांना श्रमिक एक्स्प्रेसच्या माध्यमातून घरी पोहोचवण्यात आलं आहे. रेल्वेच्या माहितीनुसार गेल्या 15 दिवसांत रेल्वेनं 1000हून अधिक कामगार गाड्यांना मान्यता दिली आहे. यातील बहुतांश गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहारदरम्यान धावल्या आहेत. या गाड्यांच्या संचालनात उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सहकार्याचे रेल्वेमंत्र्यांनी कौतुक केले आहे.कोणत्या राज्यात किती गाड्या धावण्यास परवानगीरेल्वे विभागाच्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांत दररोज दोन लाखांहून अधिक कामगारांना त्यांच्या राज्यांत पोहोचवण्यात आलं आहे. ही क्षमता येत्या काही दिवसांत तीन लाखांपर्यंत पोहोचेल. आतापर्यंत धावणा-या कामगार विशेष गाड्यांपैकी 387 गाड्या एकट्या उत्तर प्रदेशमध्ये चालवण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशने 526 गाड्या चालवण्यास मान्यता दिली आहे. बिहारमध्ये 269 ट्रेन आणि मध्य प्रदेशसाठी 81 गाड्या धावल्या आहेत. तसेच झारखंडसाठी 50, ओडिशासाठी 52 , राजस्थानसाठी  23आणि बंगालसाठी 9 श्रमिक एक्स्प्रेस चालवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना करावं लागणार क्वारंटाइन नियमांचं पालनराजधानी एक्स्प्रेसने प्रवास करण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांनी तिकिट काढण्यापूर्वी क्वारंटाईन नियमांचं पालन करण्यास सहमती दर्शविली पाहिजे. त्यानुसार प्रवाशांनी आपापल्या राज्यात पोहोचल्यावर आवश्यकतेनुसार अलग ठेवण्याचे नियम पाळले पाहिजेत. आयआरसीटीसी अधिका-यांनी ही माहिती दिली. अधिका-यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत राजधानी स्पेशलहून बंगळूरहून दिल्लीहून आलेल्या 19 प्रवाशांनी अलगीकरणात जाण्यास नकार दिला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयल