शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

Coronavirus: प्रवासी मजुरांसाठी कोणत्याही जिल्ह्यांतून श्रमिक एक्सप्रेस चालवण्यास तयार, रेल्वेची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 09:02 IST

जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिका-यांमार्फत कामगारांची यादी व त्यांच्या ठिकाणांच्या तपशिलासह अर्ज करावा लागणार आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.कोणत्याही जिल्ह्यातून रेल्वे विशेष गाड्या चालविण्यास तयार असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांच्या यादीसह राज्य नोडल अधिका-यांमार्फत अर्ज करावा लागणार आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. कोणत्याही जिल्ह्यातून रेल्वे विशेष गाड्या चालविण्यास तयार असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांच्या यादीसह राज्य नोडल अधिका-यांमार्फत अर्ज करावा लागणार आहे. गोयल यांनी एका ट्विट करत म्हटले की, देशातील विविध भागात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे कोणत्याही जिल्ह्यातून श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यास तयार आहे. यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिका-यांमार्फत कामगारांची यादी व त्यांच्या ठिकाणांच्या तपशिलासह अर्ज करावा लागणार आहे.डीएमला नोडल ऑफिसरमार्फत अर्ज करावा लागतोगोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशातील विविध भागात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे कोणत्याही जिल्ह्यातून श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यास तयार आहे. यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिका-यांमार्फत कामगारांची यादी व त्यांच्या ठिकाणांच्या तपशिलासह अर्ज करावा लागेल. रेल्वेमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यांच्या नोडल अधिका-यांची यादीही जोडली आहे.रेल्वे दररोज 300 गाड्या चालवण्यास तयाररेल्वेमंत्री गेल्या काही दिवसांपासून मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्यासाठी राज्य सरकारांच्या संपर्कात आहेत. विशेषतः राजस्थान, झारखंड आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांना त्यांच्याकडे अडकलेल्या प्रवासी मजुरांची माहिती द्यावी अन् नोडल अधिकाऱ्यांमार्फत अडकलेल्या प्रवाशांची नावं द्यावीत, असंही आवाहनही रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. 1 मे ते 15 मेदरम्यानच्या मध्यरात्रीपर्यंत देशभरात 1074 कामगार गाड्या चालविण्यात आल्या आहेत. 15 दिवसांत सुमारे 14 लाख प्रवासी कामगारांना श्रमिक एक्स्प्रेसच्या माध्यमातून घरी पोहोचवण्यात आलं आहे. रेल्वेच्या माहितीनुसार गेल्या 15 दिवसांत रेल्वेनं 1000हून अधिक कामगार गाड्यांना मान्यता दिली आहे. यातील बहुतांश गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहारदरम्यान धावल्या आहेत. या गाड्यांच्या संचालनात उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सहकार्याचे रेल्वेमंत्र्यांनी कौतुक केले आहे.कोणत्या राज्यात किती गाड्या धावण्यास परवानगीरेल्वे विभागाच्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांत दररोज दोन लाखांहून अधिक कामगारांना त्यांच्या राज्यांत पोहोचवण्यात आलं आहे. ही क्षमता येत्या काही दिवसांत तीन लाखांपर्यंत पोहोचेल. आतापर्यंत धावणा-या कामगार विशेष गाड्यांपैकी 387 गाड्या एकट्या उत्तर प्रदेशमध्ये चालवण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशने 526 गाड्या चालवण्यास मान्यता दिली आहे. बिहारमध्ये 269 ट्रेन आणि मध्य प्रदेशसाठी 81 गाड्या धावल्या आहेत. तसेच झारखंडसाठी 50, ओडिशासाठी 52 , राजस्थानसाठी  23आणि बंगालसाठी 9 श्रमिक एक्स्प्रेस चालवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना करावं लागणार क्वारंटाइन नियमांचं पालनराजधानी एक्स्प्रेसने प्रवास करण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांनी तिकिट काढण्यापूर्वी क्वारंटाईन नियमांचं पालन करण्यास सहमती दर्शविली पाहिजे. त्यानुसार प्रवाशांनी आपापल्या राज्यात पोहोचल्यावर आवश्यकतेनुसार अलग ठेवण्याचे नियम पाळले पाहिजेत. आयआरसीटीसी अधिका-यांनी ही माहिती दिली. अधिका-यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत राजधानी स्पेशलहून बंगळूरहून दिल्लीहून आलेल्या 19 प्रवाशांनी अलगीकरणात जाण्यास नकार दिला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयल