शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्दे ठरताहेत अधिक प्रभावी; कलम ३७०, यूसीसी विरुद्ध बेरोजगारी, महागाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 06:26 IST

उत्तराखंडमध्ये यंदा स्थानिक मुद्यांपेक्षा राष्ट्रीय राजकारणातील मुद्देच अधिक प्रभावी ठरत आहेत.

संतोष सूर्यवंशी, लोकमत न्यूज नेटवर्कडेहराडून : उत्तराखंडमध्ये यंदा स्थानिक मुद्यांपेक्षा राष्ट्रीय राजकारणातील मुद्देच अधिक प्रभावी ठरत आहेत. उत्तराखंडच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकींचा आतापर्यंतचा कल पाहता राज्याच्या स्थापनेपासून भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या परंतु राजकीयदृष्ट्या तेवढ्याच महत्वाच्या असलेल्या पहाडी मतांना अत्यंत महत्व आहे. त्यामुळे मुख्यत्वे भाजपने या ठिकाणी आपल्या प्रचाराचा ’फोकस’ कायम ठेवला आहे.

भाजपने गेल्या दोन्ही निवडणुकींमध्ये उत्तराखंडमध्ये क्लीन स्विप मिळवला आहे. इतर राज्यांप्रमाणेच उत्तराखंडमध्येही भाजपने यूनिफॉर्म सिव्हील कोड (यूसीसी), कलम ३७०, अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर या मुद्द्यांवर निवडणुकीचा प्रचार राबवला. देशात यूसीसी लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड ठरले होते. त्यामुळे या जोरावरच भाजपचा प्रचार सुरु आहे. उत्तराखंड राज्य सैनिकीदृष्ट्या अत्यंत संवेदनशिल आहे. त्यामुळे काँग्रेसने अग्निवीर सारख्या मुद्द्यांवरुन भाजपला घेरलं आहे. दुसरीकडे बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांप्रमाणेच निवडणूक रोख्यांचा विषयही काँग्रेसने लावून धरला आहे.

हरिद्वारकडे विशेष लक्ष भाजपने हरिद्वारच्या जागेवर विद्यमान खासदार रमेश पोखरियाल निशंक यांची उमेदवारी कापून माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांना मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे पुत्र विरेंद्र रावत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या जागेवरील लढतीकडे विशेष लक्ष आहे.

प्रियांका गांधी एकट्या लढवताहेत प्रचाराचा किल्लाउत्तराखंडमध्ये भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासारखी बलाढ्य प्रचार साखळी असताना दुरीकडे काँग्रेसने मात्र या ठिकाणी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावरच प्रचाराची धुरा ठेवली होती. या ठिकाणी प्रियंका गांधींकडून सभा, रॅलीव्दारे मतदारांच्या भेटी घेतल्या जात आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Article 370कलम 370