शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 13:35 IST

आताच्या घडीला देशात बेरोजगारी (unemployment) हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पाहायला मिळत आहे. नॅशनल इलेक्शन सर्व्हेमध्ये २०१९ मधून देशातील बेरोजगारीची समस्या तीव्र होत चालल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकोरोना काळात बेरोजगारीची समस्या तीव्रतीनपैकी दोन तरुणांना हवीय सरकारी नोकरीगेल्या ३ ते ४ वर्षांत नोकरी शोधण्यास अधिक अडचणी येत असल्याचा दावा

नवी दिल्ली : आताच्या घडीला देशात बेरोजगारी (unemployment) हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पाहायला मिळत आहे. सन २०१९ मध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बेरोजगारीची समस्या आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. अलीकडेच केंद्राकडून देण्यात आलेल्या एका आकडेवारीनुसार, गेल्या १० महिन्यात तब्बल १० हजार कंपन्या बंद झाल्या. नॅशनल इलेक्शन सर्व्हेमध्ये २०१९ मधून देशातील बेरोजगारीची समस्या तीव्र होत चालली असून, तरुणांना सरकारी नोकरीच हवी असल्याची बाब समोर आली आहे. (national election survey says unemployment is the biggest concern of the youth and govt jobs are the first choice)

राष्ट्रीय निवडणूक सर्व्हेक्षण अहवालात २५ टक्के तरुणांनी बेरोजगारीची समस्या हा सर्वांत मोठा मुद्दा असल्याचे लोकसभा निवडणुकीवेळी सांगितल्याचे म्हटले आहे. मध्य भारतातील २९ टक्के, उत्तर भारतातील ३४ टक्के आणि दक्षिण पूर्व भारतातील १६ टक्के तरुणांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर आपले म्हणणे मांडले. 

ना परीक्षा, ना मुलाखतीचं टेन्शन; १० वी पास उमेदवारांना रेल्वेत मोठी संधी

बेरोजगारीची तरुणांना सर्वाधिक चिंता

२०१९ मध्ये केलेल्या या सर्व्हेत काही प्रश्न विचारण्यात आले होते. यापैकी केंद्रातील एनडीए कार्यकाळात गेल्या ५ वर्षांत रोजगाराच्या संधी वाढल्या का, या प्रश्नावर ४५ टक्के तरुणांनी नकारात्मक, तर २८ टक्के तरुणांनी सकारात्मक उत्तर दिले. गेल्या तीन ते चार वर्षांत नोकरी शोधण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला की नाही, या दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराला ४९ टक्के तरुणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काही तरुणांच्या मते याच कालावधीत नोकरी शोधताना अधिक अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागला. 

सरकारी नोकरीला सर्वाधिक प्राधान्य

देशभरातील राज्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असल्या, तरी अधिकाधिक तरुण वर्ग सरकारी नोकरीसाठी असलेल्या परीक्षांची तयारी करत असल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे. तीनपैकी दोन तरुणांनी खासगी नोकरी, सरकारी नोकरी की स्वतःचा व्यवसाय या पर्यायांमधून सरकारी नोकरीचा पर्याय निवडला. तर १० पैकी एका तरुणाने खासगी नोकरीचा पर्याय निवडल्याचे या सर्व्हेमधून समोर आले आहे.  

कोरोना काळात चिंता वाढली

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे बेरोजगारीची समस्या आणखीनच तीव्र झाल्याचे समोर आले आहे. खेडी, गाव, शहरे येथील तरुणांची बेरोजगारीची समस्या यांमुळे वाढली आहे. बेरोजगारीची चिंता तरुणांमध्ये अधिक असल्याचेही या सर्व्हेमधून समोर आले आहे. 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीcorona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी