शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

"नसरुल्लाहपासून माझ्या आणि मुलांच्या जीवाला धोका"; अंजूच्या नवऱ्याची पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 11:50 IST

अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला असून, तिने नसरुल्लासोबत निकाह देखील केला आहे. पाकिस्तानमध्ये इस्लाम धर्म स्वीकारणारी अंजू आता फातिमा झाली आहे.

राजस्थानमधील भिवडी येथे राहणारी अंजू पती आणि दोन मुलांना सोडून 21 जुलै रोजी पाकिस्तानात गेली. अंजूने पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नसरुल्लाहशी फेसबुकवर मैत्री केली होती. यानंतर दोघे प्रेमात पडले. पती अरविंदला जयपूरला मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचं सांगून अंजू निघून गेली होती. पण जेव्हा ती पाकिस्तानात पोहोचली तेव्हा मीडियामध्ये बातम्या येऊ लागल्या, त्यानंतर ही गोष्ट समोर आली.

अलवर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला असून, तिने नसरुल्लासोबत निकाह देखील केला आहे. पाकिस्तानमध्ये इस्लाम धर्म स्वीकारणारी अंजू आता फातिमा झाली आहे. तिथून तिने पती अरविंदला फोन करून धमकी दिली. पाकिस्तानमधील एका व्यावसायिकाने अंजूला राहण्यासाठी घर भेट म्हणून देऊ केले आणि नोकरी देणार असल्याचंही म्हटलं आहे.

अंजूचा पती अरविंद याने अंजू आणि नसरुल्लाविरुद्ध राजस्थानमधील अलवरमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अरविंदने दोघांवर गंभीर आरोप केले आहेत. अंजूचे पती अरविंद यांनी सांगितले की, नसरुल्लाहपासून त्याच्या आणि मुलांच्या जीवाला धोका आहे. अंजू विवाहित आहे आणि तिचा घटस्फोट झालेला नाही हे नसरुल्लाला माहीत होते, तरीही त्याने अंजूला पाकिस्तानात बोलावले.

तक्रार नोंदवताना अरविंदने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या नसरुल्लाहने फेसबुकच्या माध्यमातून अंजूशी संपर्क साधला. तिला खोटी स्वप्नं दाखवली. आपल्या प्रेमासाठी अंजू देखील पाकिस्तानात गेली. सुरुवातीला तिने पतीला आपण परत भारतात येणार असल्याचं सांगितलं. पण नंतर निकाह केल्याने सर्वांनाच धक्का बसला. आता या घटनेची चर्चा सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान