शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

"अंजूवर मनापासून प्रेम, तिच्या मुलांना स्वीकारणार; भारतात येऊन सर्व प्रश्नांची उत्तरं देणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 10:22 IST

पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा प्रियकर नसरुल्लाह आता अंजूच्या दोन्ही मुलांना स्वीकारणार आहे. तो अंजूसोबत भारतात येईल आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देईल.

राजस्थानमधील भिवडी येथून पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा प्रियकर नसरुल्लाह आता अंजूच्या दोन्ही मुलांना स्वीकारणार आहे. तो अंजूसोबत भारतात येईल आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. आजतकशी संवाद साधताना नसरुल्लाह म्हणाला की, त्याचे अंजूवर मनापासून प्रेम आहे. टाईमपास नाही. तो तिच्यासाठी सर्वकाही करण्यास तयार आहे. व्हिसाची दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल.

भिवडी येथे राहणारी अंजू 21 जुलै रोजी पाकिस्तानात पोहोचली होती. तिथे गेल्यानंतर अंजूने खैबर पख्तुनख्वा प्रांतात राहणाऱ्या नसरुल्लाहसोबत निकाह केला. नसरुल्लाह म्हणाला की, 2019 मध्ये अंजू एका मार्केटिंग कंपनीत काम करत होती. अंजूला फेसबुक कसे वापरायचे ते माहीत नव्हते. याच दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची अंजूशी भेट झाली.

फेसबुकवर बोलत असताना अंजू आणि नसरुल्लाह यांनी नंबर्सची देवाणघेवाण केली आणि व्हॉट्सएपवर चॅटिंग सुरू केलं. संवादाचे रुपांतर प्रेमात झालं आणि दोघेही रोज तासनतास बोलू लागले. नसरुल्लाह म्हणाली की, ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. याच दरम्यान दोघांनी भेटायचं ठरवलं. त्यांना एकदा भेटायचं होतं. अंजूने टुरिस्ट व्हिसा मिळवून पाकिस्तान गाठलं.

अंजूला पाकिस्तान फिरायला मिळावं म्हणून आजूबाजूच्या परिसरातील पर्यटनस्थळं निश्चित केली. एक चांगला प्लॅन तयार केला. अंजू पाकिस्तानात पोहोचल्यावर तिचे पूर्ण आदराने स्वागत करण्यात आले. पाकिस्तान सरकारकडून सुरक्षा मागितली होती, कारण सुरक्षा आवश्यक आहे. त्यानंतर तिच्यासाठी वेगळ्या घरात राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती, पण अंजू पाकिस्तानात आल्यानंतर घाईघाईत काही चुका झाल्या.

अंजूच्या दोन्ही मुलांना स्वीकारण्यास तयार असल्याचे नसरुल्लाहने सांगितले. अंजू आणि तिचं आधी बोलणं व्हायचं, त्याच वेळी दोघांनीही ठरवलं होतं की मुलांची काळजी घेऊ. अंजूचा पती अरविंद याबाबत विचारलं असता नसरुल्लाहने सांगितलं की, अंजूने 3 वर्षांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, मात्र अरविंदने त्यावर सही केली नव्हती. तो अंजूला मारहाण करून त्रास देत असे. अंजूने त्याला हे सांगितलं होतं.

नसरुल्लाह म्हणाला की, अंजू सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे. मलाही भारतात यायचं आहे. अंजूसोबत भारतात येणार आहे. येथे तो सुरक्षा एजन्सी आणि मीडियाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यास तयार आहे. त्याने कोणतीही चूक केली नाही. भिवडीमध्ये नोंदवलेल्या एफआयआरबाबत विचारले असता त्याने सांगितलं की, माझ्याविरुद्ध एफआयआर कशासाठी नोंदवण्यात आला आहे. कोणताही गुन्हा केलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान