शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"अंजूवर मनापासून प्रेम, तिच्या मुलांना स्वीकारणार; भारतात येऊन सर्व प्रश्नांची उत्तरं देणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 10:22 IST

पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा प्रियकर नसरुल्लाह आता अंजूच्या दोन्ही मुलांना स्वीकारणार आहे. तो अंजूसोबत भारतात येईल आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देईल.

राजस्थानमधील भिवडी येथून पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा प्रियकर नसरुल्लाह आता अंजूच्या दोन्ही मुलांना स्वीकारणार आहे. तो अंजूसोबत भारतात येईल आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. आजतकशी संवाद साधताना नसरुल्लाह म्हणाला की, त्याचे अंजूवर मनापासून प्रेम आहे. टाईमपास नाही. तो तिच्यासाठी सर्वकाही करण्यास तयार आहे. व्हिसाची दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल.

भिवडी येथे राहणारी अंजू 21 जुलै रोजी पाकिस्तानात पोहोचली होती. तिथे गेल्यानंतर अंजूने खैबर पख्तुनख्वा प्रांतात राहणाऱ्या नसरुल्लाहसोबत निकाह केला. नसरुल्लाह म्हणाला की, 2019 मध्ये अंजू एका मार्केटिंग कंपनीत काम करत होती. अंजूला फेसबुक कसे वापरायचे ते माहीत नव्हते. याच दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची अंजूशी भेट झाली.

फेसबुकवर बोलत असताना अंजू आणि नसरुल्लाह यांनी नंबर्सची देवाणघेवाण केली आणि व्हॉट्सएपवर चॅटिंग सुरू केलं. संवादाचे रुपांतर प्रेमात झालं आणि दोघेही रोज तासनतास बोलू लागले. नसरुल्लाह म्हणाली की, ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. याच दरम्यान दोघांनी भेटायचं ठरवलं. त्यांना एकदा भेटायचं होतं. अंजूने टुरिस्ट व्हिसा मिळवून पाकिस्तान गाठलं.

अंजूला पाकिस्तान फिरायला मिळावं म्हणून आजूबाजूच्या परिसरातील पर्यटनस्थळं निश्चित केली. एक चांगला प्लॅन तयार केला. अंजू पाकिस्तानात पोहोचल्यावर तिचे पूर्ण आदराने स्वागत करण्यात आले. पाकिस्तान सरकारकडून सुरक्षा मागितली होती, कारण सुरक्षा आवश्यक आहे. त्यानंतर तिच्यासाठी वेगळ्या घरात राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती, पण अंजू पाकिस्तानात आल्यानंतर घाईघाईत काही चुका झाल्या.

अंजूच्या दोन्ही मुलांना स्वीकारण्यास तयार असल्याचे नसरुल्लाहने सांगितले. अंजू आणि तिचं आधी बोलणं व्हायचं, त्याच वेळी दोघांनीही ठरवलं होतं की मुलांची काळजी घेऊ. अंजूचा पती अरविंद याबाबत विचारलं असता नसरुल्लाहने सांगितलं की, अंजूने 3 वर्षांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, मात्र अरविंदने त्यावर सही केली नव्हती. तो अंजूला मारहाण करून त्रास देत असे. अंजूने त्याला हे सांगितलं होतं.

नसरुल्लाह म्हणाला की, अंजू सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे. मलाही भारतात यायचं आहे. अंजूसोबत भारतात येणार आहे. येथे तो सुरक्षा एजन्सी आणि मीडियाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यास तयार आहे. त्याने कोणतीही चूक केली नाही. भिवडीमध्ये नोंदवलेल्या एफआयआरबाबत विचारले असता त्याने सांगितलं की, माझ्याविरुद्ध एफआयआर कशासाठी नोंदवण्यात आला आहे. कोणताही गुन्हा केलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान